शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

हलका आहार घ्या, पांढरे कपडे परिधान करा

By admin | Updated: May 17, 2016 00:11 IST

अनेक दिवसांपासून शहरासह परिसराच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.

तापमानाचा पारा ४६ अंशांवर, अंगाची लाहीलाही : उष्माघात टाळण्यासाठी घ्या दक्षताअमरावती : अनेक दिवसांपासून शहरासह परिसराच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. उन्हाळ्यात उष्माघातासह विविध आजार होण्याची शक्यता असते. परंतु थोडी दक्षता घेतली तर हे आजार टाळता येऊ शकतात. या दिवसात पचनक्रिया मंदावत असल्याने हलका आहार घेण्यासह पांढरे कपडे वापरण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीत जळजळ होणे, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या होतात. कडक उन्हात प्रमाणापेक्षा अधिक काळ काम केल्याने त्वचा लाल किंवा काळसर पडते. त्यामुळे या दिवसांत उन्हापासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याची गरज असते, घराबाहेर पडताना दुपट्टा, टोपी वापरावे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. (प्रतिनिधी)उन्हाळ्यात असे होतात आजारसर्वांगदाह : या व्याधीत संपूर्ण शरीराची आग होते आणि चेहरा तसेच त्वचा निस्तेज होते. उत्साह कमी होतो. सर्वांग दाहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला थंड वातावरण ठेवावे. उन्हात जास्त काळ फिरु देऊ नये, शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावे. उष्माघात : शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ग्लानी तसेच चक्कर येते. डोके दुखणे, डोळ्यांची आग होते. खूप तहान लागते. तसे झाल्यास रुग्णाला थंड वातावरणात झोपवावे. शरीर थंड पाण्याचे पुसून घ्यावे. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी, अशी रुग्णांनी कडक उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये. कांद्याचा रस तळहाताला लावावा तसेच लिंबू पाण्याचे प्राशन करावे. लघवीला त्रास : या दिवसात लघवी होण्यास त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतमुळे लगवीत उष्णता निर्माण होते. हा त्रास होणाऱ्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा निंबू-सरबत घ्यावे. तसेच नारळ पाणी, कोकण सरबतही घ्यावे. एक चमचा जरे, एक चमा धणे ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून घ्यावा आणि त्यात चमचाभर खडीसाखर टाकून सेवन करावे. आहार कसा असावा अन् त्याची काळजी कशी घ्यावी याबाबत दक्ष राहावे. वात व पित्तदोषाची वृद्धी होत असल्याने वातूक पचायाला जड तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. टरबुज, खरबुज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळे खावी. उसाचा रस, कोकण सरबत, फळांचा ताजा रस घ्यावे. मांसाहार टाळावा, लोणी, श्रीखंड मावा दहीचे सेवन करावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, कांद्याचे सेवन करावे.