शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

हलका आहार घ्या, पांढरे कपडे परिधान करा

By admin | Updated: May 17, 2016 00:11 IST

अनेक दिवसांपासून शहरासह परिसराच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत.

तापमानाचा पारा ४६ अंशांवर, अंगाची लाहीलाही : उष्माघात टाळण्यासाठी घ्या दक्षताअमरावती : अनेक दिवसांपासून शहरासह परिसराच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. उन्हाळ्यात उष्माघातासह विविध आजार होण्याची शक्यता असते. परंतु थोडी दक्षता घेतली तर हे आजार टाळता येऊ शकतात. या दिवसात पचनक्रिया मंदावत असल्याने हलका आहार घेण्यासह पांढरे कपडे वापरण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीत जळजळ होणे, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्यता असते. अंगावर घामोळ्या होतात. कडक उन्हात प्रमाणापेक्षा अधिक काळ काम केल्याने त्वचा लाल किंवा काळसर पडते. त्यामुळे या दिवसांत उन्हापासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याची गरज असते, घराबाहेर पडताना दुपट्टा, टोपी वापरावे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. (प्रतिनिधी)उन्हाळ्यात असे होतात आजारसर्वांगदाह : या व्याधीत संपूर्ण शरीराची आग होते आणि चेहरा तसेच त्वचा निस्तेज होते. उत्साह कमी होतो. सर्वांग दाहाचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला थंड वातावरण ठेवावे. उन्हात जास्त काळ फिरु देऊ नये, शरीर वरचेवर थंड पाण्याने पुसून घ्यावे. उष्माघात : शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ग्लानी तसेच चक्कर येते. डोके दुखणे, डोळ्यांची आग होते. खूप तहान लागते. तसे झाल्यास रुग्णाला थंड वातावरणात झोपवावे. शरीर थंड पाण्याचे पुसून घ्यावे. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी, अशी रुग्णांनी कडक उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये. कांद्याचा रस तळहाताला लावावा तसेच लिंबू पाण्याचे प्राशन करावे. लघवीला त्रास : या दिवसात लघवी होण्यास त्रास होतो. शरीरात वाढलेल्या उष्णतमुळे लगवीत उष्णता निर्माण होते. हा त्रास होणाऱ्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा निंबू-सरबत घ्यावे. तसेच नारळ पाणी, कोकण सरबतही घ्यावे. एक चमचा जरे, एक चमा धणे ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून घ्यावा आणि त्यात चमचाभर खडीसाखर टाकून सेवन करावे. आहार कसा असावा अन् त्याची काळजी कशी घ्यावी याबाबत दक्ष राहावे. वात व पित्तदोषाची वृद्धी होत असल्याने वातूक पचायाला जड तिखट तसेच जास्त गरम आहार टाळावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे. टरबुज, खरबुज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळे खावी. उसाचा रस, कोकण सरबत, फळांचा ताजा रस घ्यावे. मांसाहार टाळावा, लोणी, श्रीखंड मावा दहीचे सेवन करावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच घराबाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, कांद्याचे सेवन करावे.