शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

बेलोरा विमानतळाचे १२ वर्षांपासून ‘टेक- ऑफ’ रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

गणेश वासनिक (विमानतळाचा फाेटो घेणे) राजकीय अनास्था, निधीसाठी केवळ घोषणांचा पाऊस, धावपट्टीच्या टायरिंग डांबरीकरण लेअरसाठी २१ कोटी मिळेना अमरावती ...

गणेश वासनिक (विमानतळाचा फाेटो घेणे)

राजकीय अनास्था, निधीसाठी केवळ घोषणांचा पाऊस, धावपट्टीच्या टायरिंग डांबरीकरण लेअरसाठी २१ कोटी मिळेना

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलाेरा विमानतळाची काम अपूर्णच आहे. २००९ ते २०२१ या १२ वर्षाच्या कालावधीत येथून विमाने ‘टेक-ऑफ’ घेऊ शकली नाहीत. हल्ली धावपट्टीच्या तिसऱ्या डांबरीकरणाच्या टायरिंग लेअरसाठी २१ कोटींच्या निधीची गरज आहे. तर संरक्षण भिंतीची निर्मिती निधीअभावी रखडली आहे. राजकीय अनास्थेमुळे विमानतळाचा विकास होऊ शकला नाही, हे स्पष्ट होते.

बेलाेरा विमानतळाचा विस्तार व विकास करण्यासाठी डॉ. सुनील देशमुख पालकमंत्री २६ फेब्रुवारी २००९ रोजी शासन निर्णय निर्गमित झाला. बीओटी तत्त्वावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांची विशेष उद्देश कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाची किंमत २७९.३१ कोटी मंजूर करण्यात आली. वळण मार्ग आणि भूसंपादनसाठी ६४.३३ कोटी मंजूर झाले. शासन निर्णयानुसार एमआयडीसीच्या अख्यत्यारीत तत्कालीन विमानतळाची ६४.८७ हेक्टर जमीन प्रशासकीय इमारत ३००० चौरस फूट, एटीटीएस टॉवर इमारत आदी एमएडीसीला विनामूल्य हस्तांतरित करण्यात आली. त्याअनुषंगाने विमानतळाचे विस्तारीकरण

व विकासासाठी या भागातील २८७ हेक्टर जमीन नव्याने अधिग्रहित करण्यात आली. त्याचप्रमाणे १८ हेक्टर जमीन अमरावती- यवतमाळ रस्त्याच्या स्थलांतरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर सन २०१४ मध्ये सध्या अस्तित्वातील विमानतळ, त्यावरील बांधकाम याव्यतिरिक्त संपादित केलेली जमीन, अशी एकूण ४११ हेक्टर जमीन एअरपोर्ट ॲथॉरिटीला ६० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने नूतनीकरणाच्या तरतुदींसह हस्तांतरित करण्यात आली. विविध कराच्या सवलती देताना बडनेरा-यवतमाळ वळण रस्ता, विमानतळास जोडणारा चौपदरीकरण रस्ता, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, पाणीपुरवठा या कामांसाठी ३४ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात सन २०१५ पर्यंत प्रत्यक्षात कोणतीही कामे झाली नव्हती. डॉ. सुनील देशमुख हे राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर बेलोरा विमानतळ विकासासाठी २२ फेब्रुवारी २०१६ राेजी समितीचे सदस्य, एमएडीसीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्षात विमानतळावर बैठक झाली. तेव्हा ७५ कोटी रुपये विकासकामांसाठी प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर विमानतळाचा विकासाचा मार्ग सुकर झाला होता. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती दौऱ्यावर त्यांनी बेलोरा विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणासुद्धा हवेत विरली.

-------------------

धावपट्टी डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत

बेलोरा विमानतळावरून ७२ आसनी विमाने सुरू करण्यासाठी १३७२ ऐवजी २२५० मीटर एवढी धावपट्टी वाढविण्यात आली. धावपट्टीवर दोन डांबरीकरणाचे थर टाकण्यात आले. मात्र, तिसरा महत्त्वाचा भर अद्यापही टाकला नाही. त्याकरिता २१ कोटी निधींची गरज आहे. संरक्षण भिंतीचे काम रखडले असून, त्यासाठी अडीच कोटी निधीची गरज आहे. सदर कंत्राटदारांची ९ कोटींची देयके प्रलंबित असल्याची माहिती आहे.

-------------------

ही कामेही अर्धवटच

बेलाेरा विमानतळावर वीज, पाणीपुरवठा, टर्मिनल इमारत, एटीएस टॉवर, पार्किंग, संरक्षण भिंत, विश्रामगृह, बाह्य वळण रस्ता

----------------

खासदार, आमदारांनी लक्ष देणे गरजेचे

अमरावती जिल्ह्यात विकासासाठी विमानतळ अतिआवश्यक आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याणमंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, सिंचन राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, खा. नवनीत राणा, आ. रवी राणा, सुलभा खाेडके, प्रताप अडसड, राजकुमार पटेल, बळवंत वानखडे, देवेंद्र भुयार, प्रवीण पोटे, किरण सरनाईक, रणजित पाटील यांनी लक्ष देणे काळाची गरज आहे.

--------------

कोट

सध्या बेलोरा विमानतळावर विकासकामांबाबत काही सांगता येणार नाही. कन्स्लटंटकडून सविस्तर माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर बोलता येईल.

- मोहन खडगे, ओएसडी, एमएडीसी, मुंबई