शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालय भातकुलीतच जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:43 IST

शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थांनातरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानांतरणास विरोध करणारी याचिका रद्द ठरविली असून, राज्य शासनाने १५ दिवसांच्या आत ‘नोटिफिकेशन’ काढून तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी दिले. नागपूर खंडपीठातील आर.के. देशपांडे व विनय जोशी यांच्या द्विसदस्यीय न्यायासनासमोर मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्वाळा : रवी राणा यांच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थांनातरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानांतरणास विरोध करणारी याचिका रद्द ठरविली असून, राज्य शासनाने १५ दिवसांच्या आत ‘नोटिफिकेशन’ काढून तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी दिले. नागपूर खंडपीठातील आर.के. देशपांडे व विनय जोशी यांच्या द्विसदस्यीय न्यायासनासमोर मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली.अमरावती शहरातील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुलीत स्थानांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी शासनस्तरावर जोरदार पाठपुरावा केला होता. शासनाशी लढून त्यांनी तहसील स्थानांतरणाचा आदेश मिळवून घेतला होता. मंगळवारचा न्यायालयीन आदेश त्यांच्या प्रयत्नांची फ लश्रुती होय.महसूल व वनविभागाचे अवर सचिव नि.पा. आव्हाड यांच्या निर्देशानुसार अमरावतीच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांनी जून २०१७ मध्ये अमरावती कॅम्पमधील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथिल प्रशासकीय इमारतीत स्थानांंतरित करण्याची प्रक्रिया आरंभली. तथापि १९ जून २०१७ रोजी काँग्रेस , भाजप, सेना व अन्य राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला. आ. रवि राणा यांनी तो विरोध पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगितले. त्याचवेळी विभागीय आयुक्तांच्या तहसील स्थानांतरणाच्या आदेशाविरोधात भातकुली तालुक्यातील प्रवीण भुगूल व अन्य सात जणांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.आमदार रवी राणा आग्रहीभातकुलीचा आता सर्वांगीण विकास होत आहे. मात्र, या गावात तहसीलचे मुख्यालय नसल्याने गावातील तसेच आसपासच्या ११० गावांतील नागरिकांना अमरावतीस हेलपाटे घालावे लागतात. यात त्यांना प्रचंड मनस्ताप होतो. म्हणून हे कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करावे, अशी मागणी आ. रवि राणा यांनी शासनाकडे रेटून धरली. त्यांच्या पाठपुराव्याने याप्रकरणी राज्य शासनाच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली होती.अमरावती शहरातील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे स्थानांतरित करण्याबाबत १५ दिवसांत अंतिम आदेश काढण्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. या आदेशाने भातकुली शहरात तहसील कार्यालय स्थानांतरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.- जेमिनी कासटयाचिकाकर्ते गिरीश कासट यांचे वकीलतहसील कार्यालयाच्या स्थानांतरणाचा संकल्प केला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे भक्कम पाठपुरावा केला. राज्य शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची नियुक्ती करवून घेतली. न्यायालयाने स्थानांतरणाचा आदेश दिल्याने तालुक्यातील नागरिकांचा, सत्याचा विजय झाला आहे. ४० वर्षांनंतर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.- रवि राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ