शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

तहसील कार्यालय भातकुलीतच जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:43 IST

शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थांनातरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानांतरणास विरोध करणारी याचिका रद्द ठरविली असून, राज्य शासनाने १५ दिवसांच्या आत ‘नोटिफिकेशन’ काढून तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी दिले. नागपूर खंडपीठातील आर.के. देशपांडे व विनय जोशी यांच्या द्विसदस्यीय न्यायासनासमोर मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्वाळा : रवी राणा यांच्या लढ्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थांनातरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानांतरणास विरोध करणारी याचिका रद्द ठरविली असून, राज्य शासनाने १५ दिवसांच्या आत ‘नोटिफिकेशन’ काढून तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करण्याचे आदेश ८ जानेवारी रोजी दिले. नागपूर खंडपीठातील आर.के. देशपांडे व विनय जोशी यांच्या द्विसदस्यीय न्यायासनासमोर मंगळवारी या याचिकेवर अंतिम सुनावणी झाली.अमरावती शहरातील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुलीत स्थानांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी शासनस्तरावर जोरदार पाठपुरावा केला होता. शासनाशी लढून त्यांनी तहसील स्थानांतरणाचा आदेश मिळवून घेतला होता. मंगळवारचा न्यायालयीन आदेश त्यांच्या प्रयत्नांची फ लश्रुती होय.महसूल व वनविभागाचे अवर सचिव नि.पा. आव्हाड यांच्या निर्देशानुसार अमरावतीच्या तत्कालीन विभागीय आयुक्तांनी जून २०१७ मध्ये अमरावती कॅम्पमधील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथिल प्रशासकीय इमारतीत स्थानांंतरित करण्याची प्रक्रिया आरंभली. तथापि १९ जून २०१७ रोजी काँग्रेस , भाजप, सेना व अन्य राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला. आ. रवि राणा यांनी तो विरोध पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगितले. त्याचवेळी विभागीय आयुक्तांच्या तहसील स्थानांतरणाच्या आदेशाविरोधात भातकुली तालुक्यातील प्रवीण भुगूल व अन्य सात जणांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.आमदार रवी राणा आग्रहीभातकुलीचा आता सर्वांगीण विकास होत आहे. मात्र, या गावात तहसीलचे मुख्यालय नसल्याने गावातील तसेच आसपासच्या ११० गावांतील नागरिकांना अमरावतीस हेलपाटे घालावे लागतात. यात त्यांना प्रचंड मनस्ताप होतो. म्हणून हे कार्यालय भातकुलीत स्थानांतरित करावे, अशी मागणी आ. रवि राणा यांनी शासनाकडे रेटून धरली. त्यांच्या पाठपुराव्याने याप्रकरणी राज्य शासनाच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली होती.अमरावती शहरातील भातकुली तहसील कार्यालय हे भातकुली येथे स्थानांतरित करण्याबाबत १५ दिवसांत अंतिम आदेश काढण्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. या आदेशाने भातकुली शहरात तहसील कार्यालय स्थानांतरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.- जेमिनी कासटयाचिकाकर्ते गिरीश कासट यांचे वकीलतहसील कार्यालयाच्या स्थानांतरणाचा संकल्प केला होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे भक्कम पाठपुरावा केला. राज्य शासनातर्फे बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांची नियुक्ती करवून घेतली. न्यायालयाने स्थानांतरणाचा आदेश दिल्याने तालुक्यातील नागरिकांचा, सत्याचा विजय झाला आहे. ४० वर्षांनंतर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.- रवि राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ