शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

ताडी ४७ लाखांची !

By admin | Updated: October 14, 2015 00:28 IST

एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षांनंतर जिल्ह्यातील १७ ताडी दुकानांची लिलाव प्रक्रिया मंगळवारी पार पडली.

१२ वर्षांनंतर लिलाव : १७ दुकानांची बोली, ५५ व्यापाऱ्यांचा सहभागअमरावती : एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षांनंतर जिल्ह्यातील १७ ताडी दुकानांची लिलाव प्रक्रिया मंगळवारी पार पडली. यात राज्य उत्पादन शुल्क विभागात ४७ लाख ४६ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातील ‘अण्णां’नी ठिय्या मांडला होता, हे विशेष.ताडी विक्रीचा व्यवसाय करणारे केवळ आंध्र प्रदेशातील ‘अण्णा’ हेच आहेत. या व्यवसायानिमित्त राज्यात वास्तव्यास असलेल्या ‘अण्णा’ंनीच लिलावात सहभाग घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया पार पडली. यासाठी शासनाला १९ लाख ७३ हजार रुपये येणे अपेक्षित होते. दुकाननिहाय स्पर्धात्मक पद्धतीने ‘अण्णां’नी बोली लावली. यासाठी राज्यभरातून ‘अण्णा’ आले असले तरी ही दुकाने विदर्भातील अण्णांनी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले. लिलावात एकूण ५५ जणांनी सहभाग घेतल्याची नोंद एक्साईजमध्ये आहे. ताडी दुकाने ताब्यात घेण्यासाठी ‘अण्णां’नी केलेली स्पर्धा लक्षवेधी ठरली. लिलाव प्रक्रियेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याध अधीक्षक उषा वर्मा यांच्यासह निरीक्षक एस. एन. केडीया, एस. एस. लांडगे, दुय्यम निरीक्षक एस. एस. रंधे, ए. एम. शेख, जी. एस. सिरसाम आदी उपस्थित होतेअशी तयार होते ताडीताडी हे पेय ठराविक व्यक्तीच प्राशन करतात. सिंदी वृक्षापासून ताडी तयार केली जाते. सायंकाळच्या सुमारास सिंदी वृक्षाला छेद करून त्यातून निघणारा अर्क मडक्यात गोळा करतात. सकाळी ते ताडी स्वरुपात विकले जाते. ताडी काही प्रमाणात नशा देते, असे प्राशन करणारे सांगतात.या दुकानांसाठी लिलावजिल्ह्यातील १७ ताडी दुकानांसाठी मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात येथील बेलपुरा, मसानगंज, बडनेरा, चांदूरबाजार, परतवाडा, शेंदुरजनाघाट, चांदुर रेल्वे, वरुड, अंजनगाव सुर्जी, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, टेंभुसोंडा, धारणी, हरिसाल येथील दुकानांचा समावेश आहे.शासनाच्या आदेशानुसार ताडी दुकानांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. १२ वर्षांपूर्वी ताडी विक्रीला लगाम लावण्यात आला होता. त्यावेळी सिंदीचे वृक्ष नव्हते. मात्र आता हे वृक्ष असल्याचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्या आधारावरच ही प्रक्रिया पार पडली.- उषा वर्मा, अधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क विभाग, अमरावती.