शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

वडाळीतील वणव्यामुळे ‘टी-२’ चिरोडी जंगलात

By admin | Updated: April 6, 2017 00:03 IST

वाढत्या तापमानामुळे मनुष्यच काय पण वन्यप्राणी देखील हैराण झाले आहेत.

अमरावती : वाढत्या तापमानामुळे मनुष्यच काय पण वन्यप्राणी देखील हैराण झाले आहेत. उन्हाच्या होरपळीपासून वाचण्यासाठी या वन्यपशुंनी सुरक्षित स्थळी आडोसा घेतला आहे. भरीस भर म्हणून वडाळी वनपरिक्षेत्रात वणवे पेटू लागल्याने जगंलचा राजा "टी-२" आता चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात म्हणजे चिरोडी जंगलात सुरक्षेच्या कारणास्तव शिरल्याचे निदर्शनास आले आहे. १ एप्रिल रोजी ‘टी-२’ चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला असून ४ एप्रिल रोजी तो सांवगा विठोबाच्या जंगलात सुद्धा दृष्टीस पडला आहे, हे विशेष. कातळबोडी जंगलातील "टी-२" हा वाघ स्थंलातरण करून पोहरा-मालखेड जंगलात वास्तव्यास आला आहे. पूर्वी त्याचे ‘नवाब’ हे नाव कातळबोडीत प्रचलित झाले होते. मात्र, आता अमरावती वनविभागाने त्याचे पोहरा मालखेड रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये ‘टी-२’ असे नामकरण केले आहे. ‘टी-२’च्या मुक्तसंचारावर वनविभागाचे ‘डेली मॉनिटरिंग’ सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे ‘टी-२’ वर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून दररोज ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये ‘टी-२’ कैद झाला की नाही, याकडे लक्ष ठेवले जात आहे. चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा-मालखेड जगंलात सर्वप्रथम ‘टी-२’ दृष्टीस पडला. त्यानंतर तो संपूर्ण जगंलात मुक्तसंचार करीत वडाळी वनपरिक्षेत्रात दाखल झाला. हिलटॉप पार्इंटपर्यंत त्योचे आगमन झाल्याचे मध्यंतरी निदर्शनास आले होते. ट्रॅप कॅमेऱ्यात कैदअमरावती : मात्र, सात दिवसांपासून ‘टी-२’ वडाळी वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद न झाल्याने वनविभाग चिंताग्रस्त झाला होता. मात्र, १ एप्रिल रोजी ‘टी-२’चे छायाचित्र चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘टी-२’ वडाळी वनपरिक्षेत्र सोडून चिरोडी जंगलात अचानक का निघून गेला, हा संशोधनाचा विषय बनला होता. मात्र,मागील आठवड्यात वडाळी वनपरिक्षेत्रातील भानखेडा, जेवड बिटसह अन्य काही ठिकाणी वणवा पेटल्याने ‘टी-२’ ने चिरोडीकडे धाव घेतल्याचे निदर्शनास आले आहे. १ एप्रिलला ट्रॅप कॅमेऱ्यात कैद : पाण्याच्या शोधात वन्यप्राणी सैरभैरजंगलात २४ तास पहाराचांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनमजूर रात्रंदिवस पहारा देत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वरूडा व पोहरा जगंलात दोन झोपड्या बांधून वनमजुरांना तैनात केले आहे. अद्याप चांदूररेल्वे वनात वणवा पेटला नसल्याने ‘टी-२’ या जंगलात स्वत:ला अधिक सुरक्षित समजत असावा, अशी वनवर्तुळात चर्चा आहे. वन्यप्राण्यांसाठी १५ पाणवठेचांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी तब्बल १५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५ कृत्रिम, ४ नैसर्गिक व ५ पाणवठ्यावर पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी शहर व गावाकडे धाव घेऊ नयेत, याकरिता चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे यांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पक्ष्यांसाठी वडाळी जंगलात ५०० जलपात्र उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटतात. अशावेळी पक्ष्यांची तहान भागविण्याचे संकट निर्माण होते. यासाठी वडाळीच्या जंगलात ५०० जलपात्र ठेवण्यात येणार असल्याची माहिती वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पडगव्हाणकर यांनी दिली. वन्यप्रेमी नीलेश कांचनपुरे यांनी जलपात्रे उपलब्ध करून दिली असून वनविभाग व वन्यप्रेमींद्वारे संयुक्तरित्या हा उपक्रम सुरू आहे.‘टी-२’ सध्या चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात गेला आहे. त्यामागे वडाळी जंगलात लागलेला वणवा, हे प्रमुख कारण असू शकते. दोन्ही वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार करण्यात आले आहे. -हेमंतकुमार मीणा, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग