शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सिमेंटीकरणाने चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:13 IST

शहरीकरणासाठी सिमेंटीकरणाचे वाढते प्रमाण चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण करणारे ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांनाही नैसर्गिक अधिवासासोबतच त्यांना कृत्रिम अधिवासाची आता गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरीकरणासाठी सिमेंटीकरणाचे वाढते प्रमाण चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण करणारे ठरत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांनाही नैसर्गिक अधिवासासोबतच त्यांना कृत्रिम अधिवासाची आता गरज आहे. आसाम येथे लोकसहभागातून चिमण्यांसाठी लाकडी घरट्यांचा अधिवास तयार केला गेला. परिणामी चिमण्यांची संख्या वाढली. आता अमरावतीमध्ये आसाम पॅटर्नप्रमाणे चिमणी संवर्धन करण्याचा मानस पक्षिप्रेमींचा आहे.भारतात चिमण्यांच्या नऊ प्रजातीचा अधिवास असून, महाराष्ट्रात हाऊसस्पॅरो प्रजातीच्या चिमण्या आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता या चिमण्यांची संख्या रोडावली असून, त्याला वाढते सिमेंटीकरण कारणीभूत आहे.चिमण्यांना नैसर्गिक अधिवासात राहण्याची सवय असते. मात्र, सिमेटींकरणामुळे चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी झाला आहे. परिणामी चिमण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. चिमण्यांचा प्रजनन दर चांगला असून, त्या वर्षातून तीनदा अंडी देतात. मात्र, सिमेटींकरण व त्यातच वाढत्या तापमानाचा मोठा फटका या इवल्याशा जिवाला बसत आहे. चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास आक्रसत चालल्यामुळे आता त्यांना कृत्रिम अधिवास निर्माण करण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी लोकसहभाग आणि चिमण्यांबाबत कणव आवश्यक आहे.प्लास्टिकपेक्षा लाकडाचा वापर करागेल्या काही वर्षात अमरावती शहरात चिमण्यांना कृत्रिम अधिवास तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. मात्र, तापमानात वाढ झाल्यास, प्लास्टिकचे साहित्य अधिक तापत असल्यामुळे चिमण्यांच्या जीवनप्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे चिमण्यासाठी लाकडाची घरटे तयार करणेच योग्य आहे. याशिवाय त्यांच्या पिण्याचे पाण्याची सोय करतानासुद्धा प्लास्टिकच्या साहित्यात वापर न करता मातीच्या भांड्याचा उपयोग करणेच योग्य आहे.सिमेंटीकरणाचा मोठा फटका चिमण्यांना बसला आहे. आसाममध्ये चिमण्यासाठी नैसर्गिक अधिवास तयार केला जात आहे. त्यासाठी लोकसहभागातून लाकडाची घरटी तयार केली जात आहेत. अमरावतीकरांनीही लाकडी घरटे तयार करून चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा.- यादव तरटे, पक्षी अभ्यासक.