शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

स्वप्नीलच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: November 6, 2014 22:47 IST

वय वाढले; पण समज आली नव्हती. बाबा नाहीत. आईला चिंता वाटायची. माझ्या आयुष्याची घडी बसावी यासाठी आईने शेतीवर कर्ज काढले. दोन महिन्यांपूर्वी पानटपरी सुरू केली. नव्या स्वप्नांच्या दुनियेत

हल्ल्यात सर्वस्व गेले : आताशा आयुष्याला मिळाली होती दिशाअमरावती : वय वाढले; पण समज आली नव्हती. बाबा नाहीत. आईला चिंता वाटायची. माझ्या आयुष्याची घडी बसावी यासाठी आईने शेतीवर कर्ज काढले. दोन महिन्यांपूर्वी पानटपरी सुरू केली. नव्या स्वप्नांच्या दुनियेत मी रमलो होते. बुधवारी अचानक हल्ला झाला नि काही कळायच्या आतच माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. यशोदानगर ते दस्तुरनगर रस्त्यावरील राणा कॉम्पलेक्सनजिक पानसेंटर चालविणारा तरुण स्वप्निल काळमेघ(२४) गुरुवारी फ्रेजरपुरा पोलीसठाण्यात आला होता. उद्धवस्त झालेल्या पानटपरीबाबत त्याला पोलिसांना वर्दी द्यायची होती. ठाण्याच्या बाहेर बसला असताना त्याच्या मनात माजलेले काहूर लक्षात आले. 'लोकमत'ने त्याच्याशी चर्चा केली. मनात दाटलेल्या भावना ज्वालामुखीप्रमाणे उफाळून येऊ लागल्या. शब्दांतून लढवय्य बाणा प्रतिबिंबित होत असतानाच अचानक त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यांना धारा लागल्या.सावंगा या गावातील मूळचा रहिवाशी असलेला स्वप्नील तारुण्यातील अधिक काळ उनाडपणातच रमला. लग्नाचे वय झाले. तरीही जबाबदारीचे भान त्याला आलेले नव्हते. मारामाऱ्याही त्याच्यासाठी नवख्या नव्हत्या. आपल्यानंतर मुलाचे काय? मिळकत नाही, मुलगी मागायची कशी? अशी चिंता स्वप्निलच्या जन्मदात्रीला रोज छळत होती. या महागाईच्या जमान्यात एकटीनेच घराचा गाडा रेटणाऱ्या त्या माऊलीने गावातील तीन एकर शेतीवर कर्ज काढले. स्वप्निलला कुठलीही मदत न मागता तिनेच सारी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली. लाखभर रुपयांचे कर्ज मिळविले. स्वप्निलला छानसे पानसेंटर सुरू करून दिले. स्वप्निलचे मन रमेल, ग्राहकांनाही यायला प्रसन्न वाटेल, अशा आकर्षक पद्धतीने सजविलेल्या त्या पानसेंटरचे नाव स्वप्निलने 'एस.के. पॅलेस' असे ठेवले. दोन महिन्यांपासून त्याचा व्यवसाय नियमित आणि नफ्यात सुरू होता.