शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उन्हाळी सुटी हिरावतेय आयुष्याचा आधार

By admin | Updated: April 12, 2015 00:24 IST

उन्हाळ्याची शाळेला सुट्टी लागल्यानंतर प्रत्येक घरातील मूल या सुट्टीचा आनंद घेतात़ ..

धक्कादायक : नदी, विहिरींनी घेतले बळीमोहन राऊत अमरावतीउन्हाळ्याची शाळेला सुट्टी लागल्यानंतर प्रत्येक घरातील मूल या सुट्टीचा आनंद घेतात़ परंतु जन्मदात्याचे लक्ष नसल्याने आतापर्यंत या उन्हाळी सुट्टीने जिल्ह्यात ११ वर्षांत नऊ मुलांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ उन्हाळ्याची सुट्टी आयुष्याचा आधार हिरावून घेणारी ठरू शकते़ विहीर, नदीत पोहायला गेल्यामुळे जीव गमविण्याच्या घटना घडल्या आहेत़सध्या सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा संपत असून आगामी तीन ते चार दिवसांत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत़उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे बालगोपालांसाठी आनंदाची पर्वणीच असते़ मग ती सुट्टी कोणतीही असो़ त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो आभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझेट, तब्बल दोन महिन्याहून अधिक काळ मौजमजा अन मस्तीच, शहरी भागात उन्हाळी अभ्यास वर्ग असेल तरी ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे़ पूर्वीच्या कथा अन् गाण्यातील मामांचे गाव आता उरले नसले तरी चिमुरड्यांमध्ये अद्यापही गावाकडची ओढ आहेच़ सुट्ट््या लागल्या रे लागल्या की, बालगोपालांना गावाकडचे वेध लागतात़ गावी मग मित्र, मैत्रिणी, नात्यातील सहकारी यांची गट्टी जुळली की त्यांच्या खेळण्याला जणू काही आकारच राहत नाही़ अगदी देहभान हरपून बालचमू सुट्टीचा आनंद घेत असतात़ त्यांचे जेवण्याकडेही लक्ष नसते़ दिवसभर उन्हातान्हात खेळण्यातच त्यांचा आनंद समावलेला असतो़ पोटात काय असले काय अन् नसले काय़, त्यांना काहीही फरक पडत नाही़ भुकेलाही त्यांनी जणूकाही सुट्टीच दिलेली असते़ पूर्वीचे खेळ आता हरवून गेले असून अनेक खेळ तर केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत़ चिमुरड्यांच्या भांडीकुंडी, खेळाचा बाज मात्र आजही टिकवून आहे़ ही चिमुरडी मंडळी मिळेल त्या जागेत कधी कोनाड्यात तर कधी छपरात कधी काट्याकुट्यात तर कधी अगदी घरातील एखाद्या मोडक्या टेबलखालीही भांडीकुंडीचा संसार थाटत असतात़ कोण भरउन्हात पोहायला जातो तर कोण सावलीत पत्याचा डाव मांडत असतो़ अनेकजण कॅरमसारखे बैठे खेळही खेळत उन्हाची तिरीप घालवतात़ उन्ह खाली झाले की क्रिकेटच्या मैदानावर बालगोपलांची जणूकाही जत्राच भरत असते़ खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटणाऱ्या या चिमुरड्यांकडे अनेकदा पालकांचे लक्ष नसते़ त्यातून अनेकदा या बालगोपाळांना दुखापतीचा सामना करावा लागतो़ इथपर्यंत ठीक, पण दुर्देवी घटनेत निष्पाप जीव जेव्हा जातो तेव्हा केलेल्या दुर्लक्षांचा पालकांना पश्चाताप होतो़ मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते़ अशा अनेक घटनांमुळे पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे़ मुलांची घ्या विशेष काळजी मुले खेळताना दुरून लक्ष ठेवा, धोकादायक वस्तू, कीटकनाशके मुलांच्या हाती लागतील अशी ठेवू नका, नाकातोंडात सहज जातील अशा छोट्या वस्तू मुलांपासून दूर ठेवा, अडचणीत अन् काट्याकुट्यात खेळू देऊ नका, जबाबदार व्यक्तीसोबतच पोहायला पाठवा, उष्म्यामुळे साप गारव्याच्या ठिकाणी आसरा घेत असतात हे गृहीत धरून मुलांच्या खेळण्याच्या जागा ठरवा, गारव्यासाठी घराबाहेर झोपणाऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे़