शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आश्चर्यच ! अमरावतीतील अग्निशमन वाहन दोन कोटींचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 15:40 IST

बाजारभावाची शहानिशा न करता दुप्पट दराने खरेदी केलेल्या ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहना’मुळे महापालिकेचे अग्निशमन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभाग संशयाच्या भोवऱ्यात

प्रदीप भाकरे ।आॅनलाईन लोकमतअमरावती : बाजारभावाची शहानिशा न करता दुप्पट दराने खरेदी केलेल्या ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहना’मुळे महापालिकेचे अग्निशमन विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल २ कोटी ४ लाख रुपये खर्चून खरेदी केलेल्या या वाहनासाठी विभागाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले आहेत. राष्टय बाजारपेठेत ७० लाख ते १ कोटीत उपलब्ध होणाऱ्या वाहनासाठी २ कोटी ४ लाख रुपये खर्च करण्याची बाब कुणाच्याही पचनी पडली नसून, एवढ्या किमतीत हेलिकॉप्टर घेतले काय, अशी उपरोधिक प्रतिक्रिया उमटली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या अनियमिततेबाबत तक्रार करण्यात आली असून महापालिकेची फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करावी तसेच निधी एंटरप्रायजेस या कंपनीला दिलेली वर्क आॅर्डर रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

असे आहेत आक्षेपवाहनासाठी अग्निशमन विभागाने ‘ईओआय’ (एक्स्प्रेशन आॅफ इंटरेस्ट) मागितले नाहीत. प्री-बीड मीटिंग बोलावण्यात आली नाही. वाहनाची किंमत माहीत करण्यासाठी स्थानिक वा राष्टय वृत्तपत्रात जाहिरात देऊन पुरवठादार किंवा कंपनीकडून कोटेशन मागविण्यात आले नाही. टेंडर नोटीसमध्ये वाहनाची किंमत देण्यात आली नाही. चेसीस खरेदीकरिता कोटेशन वा निविदा बोलाविण्यात आली नाही. स्वत: पुरवठादार हा मॅन्यूफॅक्चरर नसताना केवळ ‘अथॉरायझेशन सर्टिफिकेट’च्या आधारे पुरवठा आदेश देण्यात आले.

उपायुक्तांसह अग्निशमन अधिकाऱ्यांवर आरोपउपायुक्त नरेंद्र वानखडेंसह अग्निशमन अधीक्षक भारतसिंह चव्हाण संशयाच्या भोवऱ्यात आहेत. मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या सोळा पानी तक्रारीत तथाकथित कन्सल्टंट संदीप देशमुखही आहेत. निविदाप्रक्रिया मॅनेज केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहन खरेदीत कुठलीही अनियमितता झालेली नाही. तक्रारकर्त्याला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यानंतरही त्यांनी तक्रार केलेली असून, याबाबत मला भाष्य करता येणार नाही.- भारतसिंह चव्हाण, अधीक्षक, अग्निशमन विभाग महापालिका

टॅग्स :Governmentसरकार