शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: May 3, 2016 00:23 IST

संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे.

अमित हत्याकांड : ६ मे तारीख, २ आरोपीविरुध्द गृहमंत्रालयात परवानगीअचलपूर : संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे. पैकी तीन आरोपींचा मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून अजून एका आरोपीसाठी जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अचलपूरच्या गुन्हेगारी जगताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.अचलपूर येथे ११ आॅगस्ट रोजी रेती तस्करी करणाऱ्या बारुद गँगने भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर अमित बटाऊवाले या युुवकाची हत्या करून त्याचे वडील मोहन यांना गंभीर जखमी केले होते. या हत्येने अचलपूर-परतवाडा शहरासह संपूर्ण तालुका हादरला होता. यातील १५ आरोपींना मोठ्या शिताफीने अणि आपले कसब पणाला लावून ठाणेदार नरेंद्र ठाकरे व तपास अधिकारी असलेले ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे यांनी टप्प्याटप्प्याने अटक केली होती. मागील सहा-सात महिन्यांपासून ते अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. पैकी मो.शारीक अब्दूल रहमान, मो.मतीन याला फेब्रुवारीत, तर मो.आदील मो. अन्वर याला २ मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामीन मंजूर केला होता.पोलिसांनी याविरुध्द सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे एक याचिका दाखल करून मो.शारीक, मो.अश्फाक व मो.मतीन यांचा जामीन रद्द करण्याची विनंती केली आहे. या तिघांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ६ मे ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच अर्जदार खान व मो. आदील यांनाही गेल्या मार्च महिन्यात उच्च न्यायालयातून जामीन देण्यात आला होता. याचा जामीन रद्द करण्यासाठी गृहमंत्रालयाकडे, सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. दरम्यान, अचलपूर येथील जिल्हा न्यायालयाने नगरसेवक मो.शाकीर, बब्बू पठाण, मो.आबीद व अन्वरखान यांचा जामीन अर्ज २५ मार्च रोजी फेटाळला असून त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अमित बटाऊवाले हत्याकांड संपूर्ण जिल्ह्यात गाजले असून सरकारतर्फे मुंबई येथील उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.