शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: May 3, 2016 00:23 IST

संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे.

अमित हत्याकांड : ६ मे तारीख, २ आरोपीविरुध्द गृहमंत्रालयात परवानगीअचलपूर : संपूर्ण अमरावती जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील पाच आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळालेला आहे. पैकी तीन आरोपींचा मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून अजून एका आरोपीसाठी जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अचलपूरच्या गुन्हेगारी जगताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.अचलपूर येथे ११ आॅगस्ट रोजी रेती तस्करी करणाऱ्या बारुद गँगने भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर अमित बटाऊवाले या युुवकाची हत्या करून त्याचे वडील मोहन यांना गंभीर जखमी केले होते. या हत्येने अचलपूर-परतवाडा शहरासह संपूर्ण तालुका हादरला होता. यातील १५ आरोपींना मोठ्या शिताफीने अणि आपले कसब पणाला लावून ठाणेदार नरेंद्र ठाकरे व तपास अधिकारी असलेले ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आखरे यांनी टप्प्याटप्प्याने अटक केली होती. मागील सहा-सात महिन्यांपासून ते अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. पैकी मो.शारीक अब्दूल रहमान, मो.मतीन याला फेब्रुवारीत, तर मो.आदील मो. अन्वर याला २ मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामीन मंजूर केला होता.पोलिसांनी याविरुध्द सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे एक याचिका दाखल करून मो.शारीक, मो.अश्फाक व मो.मतीन यांचा जामीन रद्द करण्याची विनंती केली आहे. या तिघांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ६ मे ही तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच अर्जदार खान व मो. आदील यांनाही गेल्या मार्च महिन्यात उच्च न्यायालयातून जामीन देण्यात आला होता. याचा जामीन रद्द करण्यासाठी गृहमंत्रालयाकडे, सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती आहे. दरम्यान, अचलपूर येथील जिल्हा न्यायालयाने नगरसेवक मो.शाकीर, बब्बू पठाण, मो.आबीद व अन्वरखान यांचा जामीन अर्ज २५ मार्च रोजी फेटाळला असून त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अमित बटाऊवाले हत्याकांड संपूर्ण जिल्ह्यात गाजले असून सरकारतर्फे मुंबई येथील उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.