शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

सुनील देशमुख, अनिल बोंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी ?

By admin | Updated: October 19, 2014 23:14 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. जिल्ह्यात चार जागांवर कमळ फुलले. त्यामुळे अमरावती मतदारसंघातून

अमरावती : विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. जिल्ह्यात चार जागांवर कमळ फुलले. त्यामुळे अमरावती मतदारसंघातून विजयी झालेले सुनील देशमुख व मोर्शीचे अनिल बोंडे यांच्यापैकी एकाची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.सुनील देशमुख आणि अनिल बोंडे हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. राजकारणात अनेक वर्षांपासून या दोघांचीही कारकिर्द सुरु आहे. मात्र यापूर्वी सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, पालकमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. देशमुख हे नितीन गडकरी यांचे खासमखास असल्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेलच, असे समर्थक ठामपणे बोलू लागले आहेत. मागील विधानसभेच्या कार्यकाळात काँग्रेसचे चार आमदार असताना एकाही आमदाराला मंत्री करता आले नव्हते. एवढेच नव्हे तर बाहेरील पालकमंत्र्यांनी अमरावतीचा कारभार हाकल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र ही परिस्थिती भाजपच्या काळात येणार नाही, याची दक्षता स्थानिक भाजपचे नेते घेत असल्याची माहिती आहे. जी चूक काँग्रेसने केली, ती भाजप करणार नाही. त्याकरिता संघाची चमू कामाला लागली आहे. काहीही झाले तरी अमरावतीत कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळालेच पाहिजे, त्याकरिता आतापासूनच नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधायला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागेल, अशी दाट शक्यता आहे. देशमुख, बोंडे यांची नावे मंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.