शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

दारू दुकानापुढेच "सुंदरकांड"

By admin | Updated: April 23, 2017 00:21 IST

मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले.

अभिनव आंदोलन : मद्यपींच्या त्रासाला कंटाळले नागरिक अमरावती : मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले. शनिवारी विवेकानंद कॉलनीतील रहिवाश्यांनी दारू दुकानासमोरच "सुंदरकांड" या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारू दुकान हटविण्यासंदर्भात असा आगळा वेगळा विरोध नागरिकांनी विरोध केला. सुप्रीम कोटाने दिलेल्या मद्यविक्रीच्या निर्णयाचे अमरावतीकरांनी स्वागत केले. मात्र, महामार्गावरील सर्वच दुकाने बंद झाल्याने मद्यपींनीअंतर्गत मार्गावरील मद्यविक्री केंद्रावर धाव घेतली. परिणामी अंतर्गत मार्गावरील मद्यविक्री प्रतिष्ठानावर गर्दी वाढली. त्यामुळे अंतर्गत परिसरातील नागरिकांना त्रास सुरु झाला. असाच प्रकार विवेकानंद कॉलनीत घडला. परिसरातील वाईन अ‍ॅन्ड वाईन या दारू दुकानाजवळील रहिवाशांना मद्यपींचा त्रास सुरू झाला. सकाळी दुकान उघडल्यापासून तर रात्री ११ वाजता दुकान बंद होईपर्यंत दारु दुकानावर मद्यपींची वर्दळ सुरु होते. दारु दुकानात येणारे ग्राहक त्यांची वाहने अस्तव्यस्त स्थितीत ठेवत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले. त्यातच वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कर्कश हार्नमुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. दररोज मद्यपींचे वादविवाद, आरडाओरड, हाणामारीच्या प्रसंगाने नागरिकांची शांतता भंग झाली. दारू पिऊन उलट्या करणे, प्लास्टिकचे ग्लास फेकून घाण करणे, असे प्रकार नागरिकांना सोसावे लागत आहे. या परिसरात तीन मंदिर आहेत. नामांकित डॉक्टरांचे हॉस्पिटल्स आहेत. स्कूल बसेसचे आवागमन सुरू असते. असे प्रकार घडत असताना प्रशासनकडून मद्यविक्रेत्यालाच सरंक्षण दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शनिवारी सकाळी नागरिकांनी "सुंदर कांड" या धार्मिक कार्यक्रमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. रहिवाशांनी या मद्य विक्री प्रतिष्ठानासमोरच "सुंदर कांडाचे" आयोजन करून अभिनव आंदोलन केले. यामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. महिलांनी काही नागरिकांना दुधाचे वाटप करून दारू ऐवजी दुध प्या,चा संदेश दिला. प्रशासनाने दारू दुकान हटविण्यासंदर्भात पाऊल उचलले नाही, तर नागरिक तीव्र निषेध नोंदवतील. आयोजनासाठी माजी आमदार संजय बंड, नगरसेविका जयश्री डाहाके, राधा कुरील, रमा छांगाणी, मीनल हिवसे, वैशाली कडू, माधुरी महल्ले, स्वाती देशमुख, लता सोहोनी,आरती बापट, अंकीत देशमुख, राजू कुरील यांच्यासह शेकडो रहिवाशांनी सहभाग नोंदविला.