शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

दारू दुकानापुढेच "सुंदरकांड"

By admin | Updated: April 23, 2017 00:21 IST

मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले.

अभिनव आंदोलन : मद्यपींच्या त्रासाला कंटाळले नागरिक अमरावती : मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले. शनिवारी विवेकानंद कॉलनीतील रहिवाश्यांनी दारू दुकानासमोरच "सुंदरकांड" या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारू दुकान हटविण्यासंदर्भात असा आगळा वेगळा विरोध नागरिकांनी विरोध केला. सुप्रीम कोटाने दिलेल्या मद्यविक्रीच्या निर्णयाचे अमरावतीकरांनी स्वागत केले. मात्र, महामार्गावरील सर्वच दुकाने बंद झाल्याने मद्यपींनीअंतर्गत मार्गावरील मद्यविक्री केंद्रावर धाव घेतली. परिणामी अंतर्गत मार्गावरील मद्यविक्री प्रतिष्ठानावर गर्दी वाढली. त्यामुळे अंतर्गत परिसरातील नागरिकांना त्रास सुरु झाला. असाच प्रकार विवेकानंद कॉलनीत घडला. परिसरातील वाईन अ‍ॅन्ड वाईन या दारू दुकानाजवळील रहिवाशांना मद्यपींचा त्रास सुरू झाला. सकाळी दुकान उघडल्यापासून तर रात्री ११ वाजता दुकान बंद होईपर्यंत दारु दुकानावर मद्यपींची वर्दळ सुरु होते. दारु दुकानात येणारे ग्राहक त्यांची वाहने अस्तव्यस्त स्थितीत ठेवत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले. त्यातच वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कर्कश हार्नमुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. दररोज मद्यपींचे वादविवाद, आरडाओरड, हाणामारीच्या प्रसंगाने नागरिकांची शांतता भंग झाली. दारू पिऊन उलट्या करणे, प्लास्टिकचे ग्लास फेकून घाण करणे, असे प्रकार नागरिकांना सोसावे लागत आहे. या परिसरात तीन मंदिर आहेत. नामांकित डॉक्टरांचे हॉस्पिटल्स आहेत. स्कूल बसेसचे आवागमन सुरू असते. असे प्रकार घडत असताना प्रशासनकडून मद्यविक्रेत्यालाच सरंक्षण दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शनिवारी सकाळी नागरिकांनी "सुंदर कांड" या धार्मिक कार्यक्रमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. रहिवाशांनी या मद्य विक्री प्रतिष्ठानासमोरच "सुंदर कांडाचे" आयोजन करून अभिनव आंदोलन केले. यामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. महिलांनी काही नागरिकांना दुधाचे वाटप करून दारू ऐवजी दुध प्या,चा संदेश दिला. प्रशासनाने दारू दुकान हटविण्यासंदर्भात पाऊल उचलले नाही, तर नागरिक तीव्र निषेध नोंदवतील. आयोजनासाठी माजी आमदार संजय बंड, नगरसेविका जयश्री डाहाके, राधा कुरील, रमा छांगाणी, मीनल हिवसे, वैशाली कडू, माधुरी महल्ले, स्वाती देशमुख, लता सोहोनी,आरती बापट, अंकीत देशमुख, राजू कुरील यांच्यासह शेकडो रहिवाशांनी सहभाग नोंदविला.