शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

दारू दुकानापुढेच "सुंदरकांड"

By admin | Updated: April 23, 2017 00:21 IST

मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले.

अभिनव आंदोलन : मद्यपींच्या त्रासाला कंटाळले नागरिक अमरावती : मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या विवेकानंद कॉलनी वासींयांनी दारू दुकान हटविण्यासाठी देव हनुमानाला साकडे घातले. शनिवारी विवेकानंद कॉलनीतील रहिवाश्यांनी दारू दुकानासमोरच "सुंदरकांड" या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून दारू दुकान हटविण्यासंदर्भात असा आगळा वेगळा विरोध नागरिकांनी विरोध केला. सुप्रीम कोटाने दिलेल्या मद्यविक्रीच्या निर्णयाचे अमरावतीकरांनी स्वागत केले. मात्र, महामार्गावरील सर्वच दुकाने बंद झाल्याने मद्यपींनीअंतर्गत मार्गावरील मद्यविक्री केंद्रावर धाव घेतली. परिणामी अंतर्गत मार्गावरील मद्यविक्री प्रतिष्ठानावर गर्दी वाढली. त्यामुळे अंतर्गत परिसरातील नागरिकांना त्रास सुरु झाला. असाच प्रकार विवेकानंद कॉलनीत घडला. परिसरातील वाईन अ‍ॅन्ड वाईन या दारू दुकानाजवळील रहिवाशांना मद्यपींचा त्रास सुरू झाला. सकाळी दुकान उघडल्यापासून तर रात्री ११ वाजता दुकान बंद होईपर्यंत दारु दुकानावर मद्यपींची वर्दळ सुरु होते. दारु दुकानात येणारे ग्राहक त्यांची वाहने अस्तव्यस्त स्थितीत ठेवत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले. त्यातच वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कर्कश हार्नमुळे नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. दररोज मद्यपींचे वादविवाद, आरडाओरड, हाणामारीच्या प्रसंगाने नागरिकांची शांतता भंग झाली. दारू पिऊन उलट्या करणे, प्लास्टिकचे ग्लास फेकून घाण करणे, असे प्रकार नागरिकांना सोसावे लागत आहे. या परिसरात तीन मंदिर आहेत. नामांकित डॉक्टरांचे हॉस्पिटल्स आहेत. स्कूल बसेसचे आवागमन सुरू असते. असे प्रकार घडत असताना प्रशासनकडून मद्यविक्रेत्यालाच सरंक्षण दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शनिवारी सकाळी नागरिकांनी "सुंदर कांड" या धार्मिक कार्यक्रमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. रहिवाशांनी या मद्य विक्री प्रतिष्ठानासमोरच "सुंदर कांडाचे" आयोजन करून अभिनव आंदोलन केले. यामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग होता. महिलांनी काही नागरिकांना दुधाचे वाटप करून दारू ऐवजी दुध प्या,चा संदेश दिला. प्रशासनाने दारू दुकान हटविण्यासंदर्भात पाऊल उचलले नाही, तर नागरिक तीव्र निषेध नोंदवतील. आयोजनासाठी माजी आमदार संजय बंड, नगरसेविका जयश्री डाहाके, राधा कुरील, रमा छांगाणी, मीनल हिवसे, वैशाली कडू, माधुरी महल्ले, स्वाती देशमुख, लता सोहोनी,आरती बापट, अंकीत देशमुख, राजू कुरील यांच्यासह शेकडो रहिवाशांनी सहभाग नोंदविला.