शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

पश्चिम विदर्भात १० फुटांपर्यंत भूजलात कमी उन्हाळाअखेरची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 16:11 IST

विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. यापैकी पाच तालुक्यात भुजलस्तर तीन मीटरपेक्षा जास्त खाली गेला. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा उन्हाळाअखेर ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर हे निष्कर्ष नोंदविण्यात आले.  राज्यातील भूगर्भीय स्थिती पाहता, ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण पाषाणाने व्यापलेला आहे. यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. भेगा व सांधे निर्माण झाल्याने या पाषाणात साठवण क्षमता निर्माण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भुजलात रूपांतर होणे पूर्णपणे अवलंबून असते. गतवर्षी नैसर्गिक पुर्नभरण झालेले नसले तरी अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे स्थिती समाधानकारक आहे.सद्यस्थितीत २५ तालुक्यांची ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी कमी झाली. यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १२ व अमरावती जिल्ह्यातील ८ तालुके आहेत. १५ तालुक्यांची भूजल पातळीत १ ते २ मीटरपर्यंत कमी आली. यात सर्वाधिक ६ तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अमरावती २, अकोला ४  वाशिम २ व बुलडाणा जिल्ह्यातील १ तालुक्याचा समावेश आहे. २ ते ३ मीटरपर्यत ११ तालुक्यांच्या भूजलात कमी आली. यात सर्वाधिक सात तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आणि अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यांचा समावेश आहे. तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात कमी पाच  तालुक्यात आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ३ व अमरावती जिल्ह्यातील २ तालुक्याचा समावेश आहे.

एकूण २८ टक्के क्षेत्र पाणवहनराज्यातील मुख्य नद्यांच्या खो-याची १,५३१ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली व याचीदेखील पुन्हा तीन क्षेत्रात विभागणी करण्यात आली. यामध्ये २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी पाणवहन क्षेत्र आहे. ४४ टक्के म्हणजेच १ लाख ३५ हजार ३८३ चौ. किमी पुनर्भरण क्षेत्र, तर २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी हे साठवण क्षेत्र आहे व यात ८२ टक्के भाग हा बेसाल्ट पाषाणाचा असल्याने त्यात पाणीसाठवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे.

- पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा किमी पाऊस झाल्याने नैसर्गिक भूजल पुनर्भरण झालेले नाहीत. जलयुक्तच्या कामांमुळे ब-यापैकी स्थिती आहे. पाच तालुक्यात शास्त्रोक्त पद्धतीने जलसंधारणाचे नियोजन हवे.डॉ. पी.व्ही. कथनेउपसंचालक, जीएसडीए

टॅग्स :Amravatiअमरावती