शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

पश्चिम विदर्भात १० फुटांपर्यंत भूजलात कमी उन्हाळाअखेरची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 16:11 IST

विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. यापैकी पाच तालुक्यात भुजलस्तर तीन मीटरपेक्षा जास्त खाली गेला. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा उन्हाळाअखेर ६८० निरीक्षण विहिरींच्या नोंदीनंतर हे निष्कर्ष नोंदविण्यात आले.  राज्यातील भूगर्भीय स्थिती पाहता, ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण पाषाणाने व्यापलेला आहे. यात पाणी साठविण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. भेगा व सांधे निर्माण झाल्याने या पाषाणात साठवण क्षमता निर्माण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भुजलात रूपांतर होणे पूर्णपणे अवलंबून असते. गतवर्षी नैसर्गिक पुर्नभरण झालेले नसले तरी अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे स्थिती समाधानकारक आहे.सद्यस्थितीत २५ तालुक्यांची ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी कमी झाली. यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १२ व अमरावती जिल्ह्यातील ८ तालुके आहेत. १५ तालुक्यांची भूजल पातळीत १ ते २ मीटरपर्यंत कमी आली. यात सर्वाधिक ६ तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अमरावती २, अकोला ४  वाशिम २ व बुलडाणा जिल्ह्यातील १ तालुक्याचा समावेश आहे. २ ते ३ मीटरपर्यत ११ तालुक्यांच्या भूजलात कमी आली. यात सर्वाधिक सात तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आणि अकोला व अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यांचा समावेश आहे. तीन मीटरपेक्षा जास्त भूजलात कमी पाच  तालुक्यात आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ३ व अमरावती जिल्ह्यातील २ तालुक्याचा समावेश आहे.

एकूण २८ टक्के क्षेत्र पाणवहनराज्यातील मुख्य नद्यांच्या खो-याची १,५३१ पाणलोट क्षेत्रात विभागणी करण्यात आली व याचीदेखील पुन्हा तीन क्षेत्रात विभागणी करण्यात आली. यामध्ये २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी पाणवहन क्षेत्र आहे. ४४ टक्के म्हणजेच १ लाख ३५ हजार ३८३ चौ. किमी पुनर्भरण क्षेत्र, तर २८ टक्के म्हणजेच ८६ हजार १५३ चौ.किमी हे साठवण क्षेत्र आहे व यात ८२ टक्के भाग हा बेसाल्ट पाषाणाचा असल्याने त्यात पाणीसाठवण क्षमता फारच कमी प्रमाणात आहे.

- पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा किमी पाऊस झाल्याने नैसर्गिक भूजल पुनर्भरण झालेले नाहीत. जलयुक्तच्या कामांमुळे ब-यापैकी स्थिती आहे. पाच तालुक्यात शास्त्रोक्त पद्धतीने जलसंधारणाचे नियोजन हवे.डॉ. पी.व्ही. कथनेउपसंचालक, जीएसडीए

टॅग्स :Amravatiअमरावती