शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचे वाटोळे

By admin | Updated: May 16, 2016 00:05 IST

दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना सकस पोषण आहार मिळावा ...

पोषण आहारासाठी धान्य पुरवठा नाही : विद्यार्थ्यांचीही दांडीजितेंद्र दखने  अमरावती दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना सकस पोषण आहार मिळावा म्हणून शिक्षण विभागाने १६ एप्रिल ते १४ जून दरम्यान ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्यांमध्ये खिचडी व इतर मेनू दररोज शिजवून वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र सुट्यांमुळे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती हिच बाब शिक्षकांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे. मात्र अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांना शाळेत आणून तांदळाची खिचडी द्यावी, असा फतवा राज्य सरकारने काढला आहे. शाळेत विद्यार्थी येवोत अथवा न येतो शिक्षकांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत संबंधित शाळांमध्ये हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्या असताना देखील शिक्षकांना आपले कर्तव्य निभवावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील १४ पंचायत समितीमधील सर्व शाळांमध्ये पोषण आहाराचे वितरण करण्याचे नियोजन आहे.शाळांमध्ये धान्य नसल्याची ओरडजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना दुष्काळामुळे एप्रिल ते जून महिन्यात सुटीच्या कालावधीत शालेय पोषण आहार देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र यासाठी शाळांना धान्य पुरवठाच करण्यात आला नसल्याची ओरड खुद शि़क्षकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)सर्वच शाळांचा समावेशजिल्ह्यातील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील सर्व विद्यार्थी याशिवाय काही खासगी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांना शासनाकडून दोन महिन्यांचा पोषण आहार यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र याचा लाभ बोटावर मोजण्याइतक्याच ठिकाणी घेताना दिसत आहे. शालेय विद्यार्थ्याना पोषण आहारासाठी धान्यसाठ्याचा काही ठिकाणी तुटवडा असला तरी अशा शाळांना धान्य पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू आहे लवकरच हा पुरवठा होईल.- एस.एम. पानझाडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)