शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ अचलपूर : माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात ...

दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

अचलपूर : माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. शिवीगाळ करून दुसरे लग्न करण्याची धमकी देण्यात आली. अचलपूर पोलिसांनी आरोपी शेख नियामत, शेख रहमत, शेख अजमत, शेख नाजिम, शेख शाकीर व दोन महिला (सर्व रा. वडनेर गंगाई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

धामोरी येथील विकासकामांसाठी ३० लाख

भातकुली : प्रादेशिक पर्यटन योजनेत सांसद आदर्श ग्राम धामोरी येथील विकासकामांसाठी २ कोटी ५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी प्रत्येकी ३० लक्ष रुपये निधी दोन टप्प्यांत प्राप्त झाला. नियोजित कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पालकमंत्री ठाकूर यांनी प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा केला.

----------

गावोगावी उपकेंद्रावरही कोरोना लसीकरण

कावली वसाड : जिल्ह्यात अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांनंतर उपकेंद्रांवरही लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. त्यानंतर गावोगाव शिबिरे घेण्याचेही नियोजन आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

---------

शहानूर रस्त्याच्या बांधकामाला मुहूर्त मिळेना

अचलपूर : तालुक्यातील शहानूर रस्त्याच्या बांधकामाचे तीनतेरा झाले आहेत. रस्त्याची चाळणी झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. आजी-माजी आमदारांना निवेदनातून रस्त्याबाबत अवगत करून दिले. मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

---------------

गहू काढणीला मजूर मिळेना

दर्यापूर : काही वर्षांपूर्वी फक्त दूरध्वनीवर संपर्क साधल्यास गहू काढणीला शेकडो मजूर येत असत. यंदा उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. तालुक्यातील बरेच शेतकरी या मजुरांना आणण्यासाठी गेले असता, हे मजूर येण्यास तयारच होत नाहीत. त्यामुळे गहू काढणीला मजूर मिळेनासा झाला आहे.

---------------

महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्र कागदावर

वरूड : अभयारण्याऐवजी महेंद्री जंगल ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित करून तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वनविभागाला देऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात नसल्याने महेंद्री संरक्षित जंगलाचे घोडे कुठे अडले, असा वरूड तालुकावासीयांचा सवाल आहे.

----------------

ठक्कर बाप्पा योजनेच्या माथी सदोषता

वरूड : तालुक्यात ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेत समावेश असलेल्या आदिवासी गावांमध्ये लाखो रुपयांची कामे निकृष्ट झाल्याची ओरड आहे. अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने कामे केली जात असून, कमिशनच्या ओझ्याखाली प्रतवारी घसरली आहे.

--------------

इर्विन मार्गावर हवे गतिरोधक

अमरावती : पंचवटी ते इर्विन या महामार्गावर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन या रस्त्यावर गतिरोधक असणे अत्यंत निकडीचे झाले आहे. पंचवटीकडून वा उड्डाणपुलावरून इर्विनकडे जाणारी वाहने अत्यंत वेगाने पुढे जातात. शिवाजी सायन्स कॉलेजसमोर महामार्गाच्या दुभाजकाला वळसा घेत अनेक वाहने क्रीडा संकुलात येतात. येथे अनेक छोटे-मोठे अपघातही घडले आहेत.

-----------------

मेळघाटचे दावानल मानवनिर्मित

धारणी : मेळघाटच्या जंगलात दरवर्षी आगी लावण्याचे प्रकार सर्वाधिक प्रमाणात घडत आहेत. हजारो हेक्टर जंगलाची राखरांगोळी त्यातून होते. दुसरीकडे साप, विंचू या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाघ, अस्वल, बिबट, रानगवे, हरिण, सांबर, नीलगाय आदी प्राण्यांना जंगलात जीव वाचवीत सैरभर पळावे लागते. मात्र, वनविभाग मानवनिर्मित आगीच्या प्रकाराने हतबल झाला आहे.