शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

क्वारंटाईन व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:05 IST

मोर्शी तालुक्यातील अंबाडानजीकच्या पिंपरी येथील एका शेतमजुराने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी ही घटना उघड झाली. ज्ञानेश्वर काशिनाथ अंगारे (३२, रा. पिंपरी), असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोर्शी तालुक्यातील अंबाडानजीकच्या पिंपरी येथील एका शेतमजुराने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी ही घटना उघड झाली. ज्ञानेश्वर काशिनाथ अंगारे (३२, रा. पिंपरी), असे मृताचे नाव आहे.ज्ञानेश्वर हा काही दिवसांपूर्वी मजुरीसाठी नांदगाव खंडेश्वर येथे गेला होता. लॉकडाऊनमुळे तो नांदगाव खंडेश्वर येथे अडकून पडला. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात विविध ठिकाणी अडकून पडलेले मजूर प्रशासनाच्यावतीने स्वगृही पाठविण्यात आले. त्यात तोही गावी परतला. आरोग्य तपासणी करून ज्ञानेश्वर अंगारे याला गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत २० मे रोजी विलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ज्ञानेश्वर अंगारे यांनी शाळेनजीक असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रात्री दरम्यान तो स्वत:च्या घरी गेला. रात्रीच घरातून साडी घेऊन तो बाहेर पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शनिवारी पहाटे त्याचा मृतदेह त्याच्याच घरालगतच्या पिंपळाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ही बाब शनिवारी सकाळी उघड झाली. मोर्शी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. ज्ञानेश्वरच्या पश्चात पत्नी, सात वर्र्षांची मुलगी व दोन चिमुकली मुले आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.२० मे रोजी संबंधित इसमाला पिंपरी जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.- संजय सोळंके, ठाणेदार, मोर्शी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSuicideआत्महत्या