लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील दहा विषय समित्यांमध्ये रिक्त असलेल्या २२ पैकी २० जागांसाठी मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात विशेष सभा पार पडली. या सभेत दहा समित्यांवर जिल्हा परिषदेच्या सात सदस्यांसह १२ पंचायत समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा परिषदेत विषय समित्यांमध्ये गत तीन महिन्यांपासून २२ जागा रिक्त होत्या. त्यामुळे सदर जागा भरण्यासाठी प्रारंभी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर कोरोना महामारीचे संकट ओढवल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर ३० जून रोजी विषय समिती अध्यक्ष तथा पीठासीन सभापती बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विषय सभेत स्थायी, जलव्यवस्थापन, कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, समाजकल्याण, महिला व बाल कल्याण आदी समित्यांमध्ये २२ जागा रिक्त होत्या. सकाळी १० ते १२ वाजता दरम्यान समित्यांसाठी इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सचिव तुकाराम टेकाळे यांच्याकडे नामनिर्देश अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपताच अर्जांची छाननी करण्यात आली. यानंतर पीठासीन सभापती बबलू देशमुख यांनी समितीसाठी निवड झालेल्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली.अंजनगाव सुर्जी आणि वरूड पंचायत समिती वगळता इतर १२ पंचायत समित्यांच्या सभापतींना विविध विषय समित्यांवर संधी मिळाली. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, किशोर वानखडे, रोशन गोरडे, पंकज गुल्हाने, नीलेश तालन, विजय कविटकर, तुषार पावडे, विजय कोठाळे, नितीन मोहोरे, रूपेश चौधरी आदी उपस्थित होते.वित्त समितीत दोन जागा रिक्तवित्त विषय समितीमध्ये सर्वाधिक पाच जागा रिक्त होत्या. त्यासाठी चार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, यामध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या सभपाती वैशाली रिठे यांनी नामांकन मागे घेतल्याने तीन जणांची निवड करण्यात आली, तर दोन जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे, विषय समित्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली असली तरी दोन सदस्यांना प्रत्येकी दोन समित्यांवर प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.
विषय समित्या अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST
वित्त विषय समितीमध्ये सर्वाधिक पाच जागा रिक्त होत्या. त्यासाठी चार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, यामध्ये नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या सभपाती वैशाली रिठे यांनी नामांकन मागे घेतल्याने तीन जणांची निवड करण्यात आली, तर दोन जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे, विषय समित्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली असली तरी दोन सदस्यांना प्रत्येकी दोन समित्यांवर प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे.
विषय समित्या अविरोध
ठळक मुद्देजिल्हा परिषद : सात सदस्यांसह १२ सभापतींना संधी