शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

मिनांचा पोहरा-चिरोडी जंगलात ‘सर्जिकल स्ट्राईक’

By admin | Updated: October 16, 2016 00:06 IST

अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी शनिवारी १० कि.मी.च्या जंगलात पायी फिरून 'सर्जिकल स्ट्राईक' केले.

दोन अटकेत : २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या, १२ वासरे वनविभागाच्या ताब्यात, पशुपालकांचे दणाणले धाबे पोहरा बंदी/अमरावती : अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी शनिवारी १० कि.मी.च्या जंगलात पायी फिरून 'सर्जिकल स्ट्राईक' केले. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली. २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या व १२ वासरे ताब्यात घेण्यात आलेत. वनविभागाच्या या कारवाईमुळे पशुपालकांचे धाबे दणाणले आहे. पावसाळ्यात जंगलातील हिरव्यागार वातावरणात अवैध चराईला उधाण येते. सर्व गवत असल्याने जंगलाशेजारी असलेल्या गावांतील मेंढपाळ जनावरे अवैध चराई करण्यासाठी सोडून देतात. दररोज जंगल चराई होत असल्यामुळे नैसर्गिक संपत्तीचे मोठे नुकसान होते. वर्षभरात अवैध चराईसंदर्भात अनेकदा किरकोळ कारवाई केली जाते. मात्र, शनिवारी वनविभागाने जंगलात सर्जिकल स्ट्राईक अभियान राबवून वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईची सर्व सूत्रे उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांनी स्वत: सांभाळली. सहायक उपवनसरंक्षक राजेंद्र बोंडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही. पडगव्हाणकर, चांदुररेल्वे वनपरिक्षेत्राचे अनंत गांवडे, परतवाडा रेंजचे बारखडे, घागरे, वनपाल विनोद कोहळे, घागरे, वनरक्षक देशमुख, ठाकूर, नैतनवार, महाजन, खडसे, शेंडे, वनमजूर किशोर धोटे, बाबाराव पळसकर, दीपक नेवारे, वानखडे यांच्यासह धाडसी धाडसत्र राबविले. पोहरा जंगलात पायी फिरून चराई करणाऱ्या जनावरांची पाहणी केली. त्यामध्ये कारला बिटमधील पाथरगाव शेजारच्या जंगलातून २८९ मेंढ्या व ४० बकऱ्या ताब्यात घेण्यात आल्या. पशुपालक निंबाजी बिचुकले याला अटक केली. त्याचप्रमाणे वनविभागाच्या अन्य पथकाने भानखेडा जंगलातील ६४ बकऱ्या ताब्यात घेतल्या. येथून गोपाल रामजी चव्हाण याला अटक केली, तर दक्षिण चिरोडीच्या अंबा बिटमधून ९ बकऱ्या व १२ वासरे ताब्यात घेण्यात आल्यात. अज्ञात पशुपालकांचा वनविभागाने शोध चालविला आहे. वनविभागाने आरोपींविरुध्द भारतीय वनअधिनियम १९२७ च्या कलम २६, १ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या जनावरांना कारला येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर जनावरांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. मीना यांच्या धाडसी कारवाईमुळे पशुपालकांसह त्यांच्या अधिनस्थांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)१५ एकरांचे जंगल नष्टवडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील पोहरा, कारला व चिरोडी जंगलात वनविभागाने सर्जिकल स्ट्राईक राबवून तब्बल ४१४ जनावरांना ताब्यात घेतले. ही जनावरे दररोज चराई करीत असल्याचे निदर्शनास आले असून या जनावरांनी तब्बल १५ एकरांचे जंगल चराई करून नष्ट केले आहे. या चराईमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चराईमुळे जंगलातील ग्रेझिंनचे नुकसान होत आहे. नवीन झाडांची वाढ होत नसून ती नष्ट होत आहे. अवैध चराई ही मोठी समस्या असल्याने ही धडक कारवाई करण्यात आली. पुढील काळासाठी नैसर्गिक संपत्ती टिकविणे अत्यावश्यक आहे, तेव्हाच मानवाला शुध्द हवा व पाणी मिळू शकेल. - हेमंतकुमार मीना, उपवनसरंक्षक, वनविभाग, अमरावती