शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार; विद्यार्थ्यांनी पाठविली पत्रे अमरावती : शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यभरातील एक लाखावर विद्यार्थी व ...

प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार; विद्यार्थ्यांनी पाठविली पत्रे

अमरावती : शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यभरातील एक लाखावर विद्यार्थी व शिक्षक मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे घालणार आहे.राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. शाळा सुरू करावी अशी विनंती करणारे पत्र पाठविले जाणार आहेत. शाळा अविलंब सुरू करण्यासाठी शिक्षक समितीनेच सर्वप्रथम १६ जूनला मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे. चालू सत्रात आठव्या वर्गापासून शाळा सुरू झाल्या. मात्र अद्याप इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बंदच आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकच नव्हे तर शाळा इमारतीलाही विद्यार्थ्यांनी पाहिलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य काळोखात ढकलल्या जाण्याची दाट संभावना आहे. शिक्षकाची संघटना म्हणून शाळा सुरू करण्याच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पत्राद्वारे विनंती करण्याचा उपक्रम सुरू करत असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी स्पष्ट केले, असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले. शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षक स्वहस्ताक्षरात पोस्टकार्डद्वारे करणार आहे. प्रत्येकी पन्नास पैशाचे पोस्टकार्ड शिक्षक समितीचे पदाधिकारी उपलब्ध करून देतील. हा मजकूर शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मकच असेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा किंवा अन्य मान्यवरांचा उपमर्द होईल, असा मजकूर नसावा. पत्र लिहिताना मर्यादाभंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन संघटनेने पदाधिकाऱ्यांना केले केले आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना माहिती देऊन पत्र पाठवण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे. बाजारपेठ, सभागृहे व अन्य स्वरूपातील गर्दीची ठिकाणे सुरू झाली असताना शाळा बंद असणे अनाकलनीय आहे. बालकांच्या मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्यासाठी शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे पटवून दिले जाणार आहे. विद्यार्थी आपल्या पत्रातून शाळा बंद असल्याचे निदर्शनास आणतील. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा माझ्याकडे नसल्याने माझे शिक्षण थांबले आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा लवकर सुरू कराव्यात, अशी विनंती विद्यार्थी पत्रातून करणार आहेत.