शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार; विद्यार्थ्यांनी पाठविली पत्रे अमरावती : शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यभरातील एक लाखावर विद्यार्थी व ...

प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार; विद्यार्थ्यांनी पाठविली पत्रे

अमरावती : शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यभरातील एक लाखावर विद्यार्थी व शिक्षक मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे घालणार आहे.राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. शाळा सुरू करावी अशी विनंती करणारे पत्र पाठविले जाणार आहेत. शाळा अविलंब सुरू करण्यासाठी शिक्षक समितीनेच सर्वप्रथम १६ जूनला मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे. चालू सत्रात आठव्या वर्गापासून शाळा सुरू झाल्या. मात्र अद्याप इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग बंदच आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकच नव्हे तर शाळा इमारतीलाही विद्यार्थ्यांनी पाहिलेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य काळोखात ढकलल्या जाण्याची दाट संभावना आहे. शिक्षकाची संघटना म्हणून शाळा सुरू करण्याच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पत्राद्वारे विनंती करण्याचा उपक्रम सुरू करत असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष उदय शिंदे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी स्पष्ट केले, असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दीप्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले. शाळा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षक स्वहस्ताक्षरात पोस्टकार्डद्वारे करणार आहे. प्रत्येकी पन्नास पैशाचे पोस्टकार्ड शिक्षक समितीचे पदाधिकारी उपलब्ध करून देतील. हा मजकूर शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मकच असेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा किंवा अन्य मान्यवरांचा उपमर्द होईल, असा मजकूर नसावा. पत्र लिहिताना मर्यादाभंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन संघटनेने पदाधिकाऱ्यांना केले केले आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना माहिती देऊन पत्र पाठवण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे. बाजारपेठ, सभागृहे व अन्य स्वरूपातील गर्दीची ठिकाणे सुरू झाली असताना शाळा बंद असणे अनाकलनीय आहे. बालकांच्या मानसिक, भावनिक व सामाजिक आरोग्यासाठी शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे पटवून दिले जाणार आहे. विद्यार्थी आपल्या पत्रातून शाळा बंद असल्याचे निदर्शनास आणतील. ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा माझ्याकडे नसल्याने माझे शिक्षण थांबले आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा लवकर सुरू कराव्यात, अशी विनंती विद्यार्थी पत्रातून करणार आहेत.