शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा वापर करावा

By admin | Updated: August 4, 2015 00:04 IST

विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी प्रयत्न न करता आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून नोकऱ्यांची निर्मिती करून राष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लावावा, ..

विजय भटकर यांचे प्रतिपादन : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ६०९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप अमरावती : विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीसाठी प्रयत्न न करता आपल्या सर्जनशीलतेचा वापर करून नोकऱ्यांची निर्मिती करून राष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लावावा, असे प्रतिपादन विजय भटकर यांनी केले. आजचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी हा वैश्विक नागरिक म्हणून तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संस्था पातळीवरील पाचव्या पदवी प्रमाणपत्र प्रदान समारोहात ते बोलत होते. हा कार्यक्रम संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात सोमवारी पार पडला. यावेळी विविध शाखांच्या एकूण ६०९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व व गुणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विजय भटकर, सदस्य जी.एन. वानखडे, संजय बांबल, शैक्षणिक अधिष्ठाता सूरज खंते, एन.डी. घवघवे, व्ही.बी. विरूळकर, एस.एस. पुसदकर, प्राचार्य वा.झि. गंधारे आदी उपस्थित होते. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अर्जित केलेले ज्ञान समाजाच्या विविधांगी विकासासाठी उपयोगात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यानी केले. यावेळी विजय भटकर, कुलगुरू मोहन खेडकर यांच्या हस्ते स्थापत्य अभियांत्रिकीचे अभिषेक कुशवाह, यंत्र अभियांत्रिकीचे प्रतीक खवले, विद्युत अभियांत्रिकीचे अजय खर्चे, अणुविद्युत अभियांत्रिकीचे अर्जुन शेंडे, संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे अजय खरात, उपकरणीकरण अभियांत्रिकीचे अरविंद दीक्षित, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीचे आशुतोष किनगावकर या सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. कॉगनिझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन पुणेचे संचालक संजय बांबल यांच्या हस्ते सन २०१४-१५चा उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार यंत्र अभियांत्रिकीचे मंगेश देशमुख व उत्कृष्ट विद्यार्थ्यासाठीचा पुरस्कार स्थापत्य अभियांत्रिकीच्या नितीन देवरे यांना प्रदान करण्यात आला. सद्यस्थितीत संस्थेमध्ये सात अभियांत्रिकी विद्या शाखांमध्ये पदवी व आठ पदव्युत्तर नियमित व पाच पदव्युत्तर अंशकालीन अभ्यासक्रम आहेत. संस्थेला पीएचडीकरिता विद्यापीठाची संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला सन २००६ पासून स्वायत्तता मिळाली असून जागतिक बँकेच्या तंत्रशिक्षण गुणवत्ता वाढ कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी संस्थेची निवड झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संस्थेचा पदवीदान समारोह लक्षणीय ठरला. शैक्षणिक अधिष्ठाता सूरजन खंते व सहायक प्राध्यापक क्षितिजा कदम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व अध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)