शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

विद्यार्थ्यांना लॅपटॉप; आदेश कागदावरच!

By admin | Updated: December 13, 2014 00:46 IST

खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याची भाषा होत आहे. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक शाळा ओस पडत आहेत.

अमरावती : खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याची भाषा होत आहे. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक शाळा ओस पडत आहेत. हीच स्थिती कॉलेज, विद्यापीठ स्तरावरही आहे. शिक्षणातील गुणवत्तेचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा तेथील सुविधांचा मुद्दा समोर येतो. त्या सुविधांबद्दल शासन आणि प्रशासनाकडून आदेश दिले जातात. पण ते फक्त कागदावर राहतात. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना रिक्त जागा भरण्याचे व नेट-सेटधारकांची विषयवार नोंदणी करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यावर राज्यातील विद्यापीठांची कार्यवाही पाहिली तर या निर्देशांची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. शिक्षणाचे क्षेत्र विस्तारले असले तरी शिक्षणक्षेत्रातील प्रश्न तेथील समस्या कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्तेबाबत चर्चा वारंवार होते. शासन आणि प्रशासन स्तरावरून त्यासाठी प्रयत्न होत आहेत. परंतु ती तोकडी व तकलादू ठरत आहे. त्यामुळे गुणवत्तेची चर्चा केवळ कागदापुरतीच मर्यादित राहते. उच्च शिक्षणाबाबत दिवसेंदिवस चिंता व्यक्त केली जाते. विशेषत: संशोधन आणि दर्जेदार शिक्षणाबाबत बोलले जाते. यावर नियंत्रण ठेवणारी आणि त्याला बळ देणारी व्यवस्था अधिक सक्षम नसल्याने आणि ‘चलता है तो..’ या वृत्तीमुळे प्रश्न अधिक जटील होताहेत. शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरुन होणारे प्रयत्न निष्काम ठरतात. विद्यापीठांतील रिक्त जागांचा आकडा पाहिला तर उच्च शिक्षणाची वाटचाल दर्शविते. हे लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगालाही याची दखल घ्यावी लागली. विद्यापीठांच्या विभागामधील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरा, असे निर्देश आयोगाने देशभरातील विद्यापीठांना दिले आहेत. देशातील विद्यापीठांमधील अंदाजे ४० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. त्याची आयोगाला दखल घ्यावी लागली. पदे न भरल्यास अनुदानावरही गदा येईल, असे आयोगाने सूचित केले. या भूमिकेमुळे विद्यापीठातील रिक्त पदांचा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे. आयोगाने निर्देश देणे ठीक आहे, पण विद्यापीठांची त्यावरील कार्यवाही फारशी समाधानकारक नाही. विद्यापीठांमध्ये रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत नाही. मराठवाड्यात दोन कृषी विद्यापीठ आहेत. तेथे असणाऱ्या पात्र शिक्षकांचा विचार केल्यास अनेक विभागांत बोटावर मोजण्याइतके शिक्षक कार्यरत आहेत. नव्याने सुरू करण्यात आलेल्या अनेक विभागांमध्ये तर अतिशय धक्कादायक चित्र आहे. अशावेळी तेथील गुणवत्ता जोपासण्यासाठी विद्यापीठ स्तरावर होणारे प्रयत्न हे किती पोकळ असतात याची कल्पना केलेली बरी. पात्र आणि पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. शिक्षक नसल्याने विद्यापीठ प्रशासन तात्पुरत्या शिक्षकांच्या भरवशावर काम भागवते. विद्यापीठातच शिक्षकांची वानवा असेल आणि विद्यापीठे त्याला गांभिर्याने घेत नसतील किंवा महाविद्यालयांनाही बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नसेल तर आयोगानेही याबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. पत्रांचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. परंतु केवळ आदेशापुरते पत्र काढले तर अशा अनेक आदेशांना विविध कारणांनी केराची टोपली दाखविणे विद्यापीठाला नवीन नसेल. आयोगाने राज्य सरकारच्या मदतीने नेट-सेट विद्यार्थ्यांबाबत अशाच प्रकारे विद्यापीठांना आदेशित केले. आपल्या कार्यक्षेत्रातील विषयनिहाय नेट-सेट धारकांची यादी तयार करणे, ती 'अपडेट' करणे अशा सूचना केल्या होत्या. परंतु राज्यातील विद्यापीठांनी या आदेशाला जुमानले नाही. अनेक विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची 'अपडेट' यादी उपलब्ध नाही. तसे प्रयत्नही विद्यापीठांनी केलेले नाहीत. अशा प्रकारांमुळेच गुणवत्तेला खीळ बसत आहे, याची जाणीव ठेवून विद्यापीठ अनुदान आयोग, उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठांनी लक्षात ठेवायला हवे. (प्रतिनिधी)