शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

तीन तास थांबली एसटीची चाके

By admin | Updated: December 18, 2015 00:13 IST

सन २०१२-२०१६ कामगार करार रद्द करुन या कालावधीतच २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा,

इंटकचे आंदोलन : पोलीस बंदोबस्तात निघाल्या बसेसअमरावती : सन २०१२-२०१६ कामगार करार रद्द करुन या कालावधीतच २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कस काँग्रेस (इंटक)ने गुरुवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. हा संप राज्यभर पुकारण्यात आला आहे. त्याचा फटका हजारोे प्रवाशांना सहन करावा लागला. गुरुवारी सकाळी ६.३० ते ९.३० या कालावधीत मध्यवर्ती बसस्थानकामध्ये इंटकच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारल्याने एसटीची चाके थांबली होती. दुसरीकडे बाहेरगावावरुन बसस्थानकात येणाऱ्या एसटीची मालटेकडीपर्यंत रांग लागली होती. या तीन तासांच्या कालावधीत कोणतीही बस स्थानकाबाहेर पडली नाही. त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांच्या मदतीने एसटीची वाहतूक पूर्ववत करण्यात आली. यावेळी इंटकविरुद्ध महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे कामगार समोरासमोर ठाकले होते. एसटी कामगार संघटना आंदोलनापासून दूरअमरावती : एसटी कामगार संघटनेचा या बंदला पाठिंबा नसल्याने हे आंदोलन दडपण्यात आल्याचा आरोप इंटकने केला. आगार प्रमुखांनी इंटकच्या आंदोलनाची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत एसटीच्या फेऱ्या सोडण्यात आल्यात. या आंदोलनाचे नेतृत्त्व विभागीय सचिव राजाभाऊ लुंगे यांनी केले. या संपात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सहभागी नाही. इंटकचा संप प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरणारा असून राज्यातील ७० हजार सभासद यात सहभागी नसल्याचे एसटी कामगार संघटनेचे प्रादेशिक सचिव अभय बिहुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)