शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण, ११२३ पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचा कालबद्ध कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:48 IST

अमरावती : गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राज्यभरातील साठ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जुन्या व ब्रिटिशकालीन अशा २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले.

अमरावती : गतवर्षी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने राज्यभरातील साठ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या जुन्या व ब्रिटिशकालीन अशा २९०० पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. यापैकी ११२३ पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचा एक वर्षाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यासाठी १७९२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. जिल्ह्यातील ४७ पुलांचे आॅडिट करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गतवर्षी सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग, सर्वच धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सावित्रीच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वच पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात या पुलाचे आॅडिट करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अमरावती जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रीय महामार्गावर ब्रिटिशकालीन पूल आहेत, तर काही पूल स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत; परंतु तेही आता धोकादायक झाले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरण अंतर्गत आता नवीन पूल बांधले जाणार आहेत.राज्य शासनाने राज्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी प्रथमच १८४ कोटी इतक्या भरीव रकमेची तरतूद केली आहे. वर्षभरात १६ पुलांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दुरुस्तीची अचानक गरज भासल्यास ५० लाखांपर्यंत खर्चाचे अधिकार मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. ५० लाखांपेक्षा अधिक खर्च असल्यास ४८ तासांत मंत्रालयातून मंजुरी व आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नवीन धोरण आखण्यात आले आहे. नाबार्ड अंतर्गत तीन वर्षांत ग्रामीण भागात ७४२ पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.पुलाचा धोका टाळण्यासाठी सेन्सर प्रणालीपावसाळ्यात पुराचा धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाच्या पुलांना सेन्सर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील महत्त्वाच्या दोनशेपेक्षा जास्त पुलांना इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर बसविण्यात आले आहेत. पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्यास ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणेस धोक्याचा अलार्म वाजवून सूचित केले जाते.

टॅग्स :Amravatiअमरावती