शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

आडकाठी : शेती विकासाला चालना देण्यासाठी भरीव निधीची गरज

By admin | Updated: February 18, 2015 00:08 IST

कोरडवाहू शेती अभियानासाठी राज्य शासनाने चालू वर्षात अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली.

अमरावती : कोरडवाहू शेती अभियानासाठी राज्य शासनाने चालू वर्षात अर्थसंकल्पात दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यापैकी ९० कोटी रुपयांच्या कार्यक्रमाला यापूर्वीच तर आता नव्याने २२ कोटी ५० लाख रुपयांच्या कार्यक्रमाला वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने याबाबतचा नुकताच आदेश जारी केला. मात्र अमरावतीसह राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी महत्वांकांक्षी ठरणाऱ्या या अभियानाला अंमलबजावणी निधी पुरेसा मिळाला नसल्याने फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आघाडी सरकारने सन २०१४-१५ ते २०१८-२०१९ या पाच वर्षात राज्यात कोरडवाहू शेती अभियान राबविण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत तब्बल वीस हजार कोटी रुपयांचा जमीन विकास कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यापैकी दोन हजार कोटी रुपये कोरडवाहू शेती अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र्यरित्या उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात राज्यभरातील कोरडवाहू शेतीच्या स्थैर्याची तरतूद करणे, या बाबीसाठी शासनाने १५० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी ९० कोटी रुपयांच्या वाटपाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. आता नव्याने २२ कोटी ५० लाख रुपयांच्या वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)