शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

शेतकरी कल्याणासाठी सहकार चळवळ मजबूत व्हावी

By admin | Updated: September 1, 2015 00:02 IST

'विना सहकार नही उध्दार' या घोष वाक्यानुसार सहकार चळवळ मजबूत करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वांनी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, ...

संजय राठोड यांचे प्रतिपादन : भव्य सहकार मेळाव्याचे आयोजनअमरावती : 'विना सहकार नही उध्दार' या घोष वाक्यानुसार सहकार चळवळ मजबूत करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वांनी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रविवारी केले.तिवसा येथे आयोजित भव्य सहकार मेळाव्यात मार्गदर्शक करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे हस्ते झाले. यावेळी विधानसभा माजी उपाध्यक्ष शरद तसरे, माजी आमदार संजय बंड, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, बाजार समितीचे पदाधिकारी, सदस्य, तिवसा पंचायत समिती सदस्य, शेतकरी पॅनेलचे सदस्य उपस्थित होते.संजय राठोड म्हणाले, राज्यात विविध सहकारी कार्यरत संस्था आहे. सहकार विभागाव्दारे विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. सहकारी सस्थांनी जबाबदारी समजून जनतेला व शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती व लाभ करुन द्यावा. शेती पिकांबाबत व सिंचन सुविधेसंबंधी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास चांगला भाव, माल ठेवण्यासाठी गोदाम, साठवणूक आदी बाबींची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. विदर्भात कोरडवाहू जमीन आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी त्याप्रमाणात भरघोस उत्पादन होत नाही. या समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करुन सोडविण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहनही राज्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले की, विदर्भात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सर्व सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना सहकारचे महत्त्व पटवून देऊन सहकारी संस्थेच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो यासंबंधी जनजागृती करावी. राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना करुन द्यावी. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून राज्यात शासनाव्दारे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सुमारे २४३ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे सुमारे १० हजार ६०० हेक्टर जमिनीवर सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाव्दारे अन्न सुरक्षा योजना आणून याचा सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी शासनाव्दारे पुरस्कृत करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोटे यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव लसणापुरे यांनी, संचालन शंतनू देशमुख यांनी केले. यावेळी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)