शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कल्याणासाठी सहकार चळवळ मजबूत व्हावी

By admin | Updated: September 1, 2015 00:02 IST

'विना सहकार नही उध्दार' या घोष वाक्यानुसार सहकार चळवळ मजबूत करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वांनी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, ...

संजय राठोड यांचे प्रतिपादन : भव्य सहकार मेळाव्याचे आयोजनअमरावती : 'विना सहकार नही उध्दार' या घोष वाक्यानुसार सहकार चळवळ मजबूत करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वांनी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी रविवारी केले.तिवसा येथे आयोजित भव्य सहकार मेळाव्यात मार्गदर्शक करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे हस्ते झाले. यावेळी विधानसभा माजी उपाध्यक्ष शरद तसरे, माजी आमदार संजय बंड, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, बाजार समितीचे पदाधिकारी, सदस्य, तिवसा पंचायत समिती सदस्य, शेतकरी पॅनेलचे सदस्य उपस्थित होते.संजय राठोड म्हणाले, राज्यात विविध सहकारी कार्यरत संस्था आहे. सहकार विभागाव्दारे विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. सहकारी सस्थांनी जबाबदारी समजून जनतेला व शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती व लाभ करुन द्यावा. शेती पिकांबाबत व सिंचन सुविधेसंबंधी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास चांगला भाव, माल ठेवण्यासाठी गोदाम, साठवणूक आदी बाबींची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. विदर्भात कोरडवाहू जमीन आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी त्याप्रमाणात भरघोस उत्पादन होत नाही. या समस्येकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करुन सोडविण्याचा प्रयत्न करावे, असे आवाहनही राज्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले की, विदर्भात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सर्व सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना सहकारचे महत्त्व पटवून देऊन सहकारी संस्थेच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो यासंबंधी जनजागृती करावी. राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना करुन द्यावी. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून राज्यात शासनाव्दारे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सुमारे २४३ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामुळे सुमारे १० हजार ६०० हेक्टर जमिनीवर सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाव्दारे अन्न सुरक्षा योजना आणून याचा सुमारे दोन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांनी आपले जीवनमान उंचावण्यासाठी शासनाव्दारे पुरस्कृत करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोटे यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव लसणापुरे यांनी, संचालन शंतनू देशमुख यांनी केले. यावेळी संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)