शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावातील पथदिवे दिवसा सुरू, रात्री बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

अंजनगाव सुर्जी : शहरातील मुख्य रस्त्यावरील पूर्वीचे सीएफएल दिवे काढून त्या जागेवर नवीन एलएडी दिवे लावण्याचे आदेश राज्यातील सर्व ...

अंजनगाव सुर्जी : शहरातील मुख्य रस्त्यावरील पूर्वीचे सीएफएल दिवे काढून त्या जागेवर नवीन एलएडी दिवे लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगर परिषदांना देण्यात आले होते. त्यानुसार ईईसीएल या कंपनीने अंजनगाव शहरात एलएडी पथदिवे लावले. मात्र, ते पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद अशी सध्याची अवस्था आहे.

विशेष म्हणजे, सदर कंपनीकडे पाच वर्षांपर्यंत एलईडी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. ती लेखी स्वरूपात ठरली आहे. सुरुवातीला पथदिवे लागताच शहरात झगमगाट दिसत होता. परंतु, संपुर्ण शहरात पथदिवे उभारल्यानंतर केवळ आठ दिवसांतच ते पथदिवे दिवसा सुरू, तर रात्री बंद अशी स्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती आजही कायम आहे. एक वर्षापासून बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती कंपनीकडून करण्यात आलेली नाही. उलट दिवसा काही पथदिवे सुरू राहत असल्यामुळे वीज देयकाचा भार हा पालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. याबाबत पालिकेकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. दहा महिन्यांपूर्वीच नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीकडून पाच लाख रुपये वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला व तसा पत्रव्यवहारसुद्धा कंपनीकडे करण्यात आला. तरीसुद्धा ईईएसएल कंपनीकडून शहरातील बंद पडलेले पथदिवे बदलवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कंपनीची चूक असताना, शहरातील नागरिकांमध्ये नगरसेवकांप्रति नाराजीचा सूर दिसून येत आहे.

पालिकेला आल्या मर्यादा

शासनाचे ध्येयधोरणानुसार नगर परिषदेला नवीन पथदिवे विकत घेण्याची मुभा नाही. त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूददेखील नाही. ईईसीएलने लावलेल्या पथदिव्यांची पालिकेला दुरुस्तीदेखील करता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांसमोर मोठा पेच उभा ठाकला आहे.