शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंजनगावातील पथदिवे दिवसा सुरू, रात्री बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

अंजनगाव सुर्जी : शहरातील मुख्य रस्त्यावरील पूर्वीचे सीएफएल दिवे काढून त्या जागेवर नवीन एलएडी दिवे लावण्याचे आदेश राज्यातील सर्व ...

अंजनगाव सुर्जी : शहरातील मुख्य रस्त्यावरील पूर्वीचे सीएफएल दिवे काढून त्या जागेवर नवीन एलएडी दिवे लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगर परिषदांना देण्यात आले होते. त्यानुसार ईईसीएल या कंपनीने अंजनगाव शहरात एलएडी पथदिवे लावले. मात्र, ते पथदिवे दिवसा सुरू अन् रात्री बंद अशी सध्याची अवस्था आहे.

विशेष म्हणजे, सदर कंपनीकडे पाच वर्षांपर्यंत एलईडी पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. ती लेखी स्वरूपात ठरली आहे. सुरुवातीला पथदिवे लागताच शहरात झगमगाट दिसत होता. परंतु, संपुर्ण शहरात पथदिवे उभारल्यानंतर केवळ आठ दिवसांतच ते पथदिवे दिवसा सुरू, तर रात्री बंद अशी स्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती आजही कायम आहे. एक वर्षापासून बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती कंपनीकडून करण्यात आलेली नाही. उलट दिवसा काही पथदिवे सुरू राहत असल्यामुळे वीज देयकाचा भार हा पालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. याबाबत पालिकेकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. दहा महिन्यांपूर्वीच नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल कंपनीकडून पाच लाख रुपये वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला व तसा पत्रव्यवहारसुद्धा कंपनीकडे करण्यात आला. तरीसुद्धा ईईएसएल कंपनीकडून शहरातील बंद पडलेले पथदिवे बदलवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कंपनीची चूक असताना, शहरातील नागरिकांमध्ये नगरसेवकांप्रति नाराजीचा सूर दिसून येत आहे.

पालिकेला आल्या मर्यादा

शासनाचे ध्येयधोरणानुसार नगर परिषदेला नवीन पथदिवे विकत घेण्याची मुभा नाही. त्यासाठी शासनाकडून निधीची तरतूददेखील नाही. ईईसीएलने लावलेल्या पथदिव्यांची पालिकेला दुरुस्तीदेखील करता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांसमोर मोठा पेच उभा ठाकला आहे.