शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर अवकळा, नागरिक हैराण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2016 00:15 IST

शहरातील गडगडेश्वर परिसरातील न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम कॉलनी, पुष्पक कॉलनी परिसराचा फेरफेटका मारला असता....

तक्रारींचा रतीब, दुरूस्ती नाही : न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम-पुष्पक कॉलनीवासीयांची व्यथाअमरावती : शहरातील गडगडेश्वर परिसरातील न्यू शिक्षक कॉलनी, अनुपम कॉलनी, पुष्पक कॉलनी परिसराचा फेरफेटका मारला असता या भागातील नागरिक किती बिकट अवस्थेत जीवन जगत आहेत, याची प्रचिती येते. या भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. नव्हे, रस्त्यांवर नुसते खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. याशिवाय इतरही समस्या आहेत. मात्र, महापालिकेकडे तक्रारींचा रतीब घालूनही कोणताच मार्ग निघत नसल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यानच्या काळात गडगडेश्वर प्रभागात डीपी मार्गाचे खडीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून कोणत्याही रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या भागातील नागरिकांना विविध गरजांसाठी सातत्याने मध्यवस्तीत यावे लागते. परंतु येथील रस्त्यांची दुर्दशा बघता पायी वाहनांचे तर सोडाच, पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. अनेकदा किरकोळ अपघात घडलेत. महापालिकेला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे काय, असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत. परिसरातील पथदिवेदेखील बंद आहेत. त्यामुळे परिसरात असामाजिक तत्त्व सक्रिय असतात. परिणामी चोऱ्यांचे प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रात्रीच्या वेळी या मार्गाने ये-जा करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. परिसरातील काही जागरूक नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे निवेदन, लेखी तक्रारी देऊन या भागातील समस्या सोडविण्याची मागणी केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी महापालिका प्रशासनाविरूद्ध सामान्य जनतेमध्ये रोष पसरला आहे. या भागातील डीपी मार्गाची तातडीने सुधारणा करून पथदिवे बसवावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून गिरीधर गुल्हाने, मधुकर वडनेरकर, उमेश शेलोकार, रवि पोल्हाड, अतुल बोदडे, राजकुमार कनोजे, स्मिता डेरे, श्रीकृष्ण पळसकर, महेश पळसकर, सुरेश पोदार आदींसह शेकडो नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत परिसरातील खड्डेमय रस्ते, अंधार आणि इतर समस्यांमुळे या भागातून अन्यत्र ये-जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. कित्येकदा विद्यार्थ्यांचे अपघातही होतात. त्यामुळे शाळेत अथवा ट्यूशनला गेलेला पाल्य परतेपर्यंत पालकांचा जीव टांगणीलाच राहतो.