शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

शाळा सुरू करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:54 IST

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता, आवश्यक संसाधनांचा वापर करून शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थिहिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळा सुरू करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता, आवश्यक संसाधनांचा वापर करून शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थिहिताचा निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी येथे सांगितले.जिल्हा नियोजन भवनात राज्यमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. आमदार रणजित पाटील, महापालिका शिक्षण सभापती गोपाल धर्माळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, सहायक शिक्षण संचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह शासकीय, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी शाळांचे संचालक व विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपून व कार्यपद्धती निश्चित करून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेऊ. शैक्षणिक नुकसान टळावे, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने शुक्रवारी झालेल्या शिक्षण परिषदेत प्राप्त झालेल्या सूचनांचा उपयोग नक्कीच होईल. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले जाईल, असे ना. कडू म्हणाले.परिषदेत कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे स्वरूप व कार्यपद्धती याविषयी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शासकीय व खासगी शाळांचे व्यवस्थापन, शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांच्याकडून प्राप्त सूचनांनुसार शिक्षणाचे स्वरूप व कार्यपद्धतीच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय होण्यासाठी उपयोग होईल, असे ना. कडू यांनी सांगितले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संघटनांसह इतर विविध शिक्षण संघटनांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून राज्यमंत्र्यांनी त्यांची मते जाणून घेतली.

टॅग्स :SchoolशाळाBacchu Kaduबच्चू कडू