शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वादळाचा शहराला तडाखा, झाडांखाली दबल्या कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली.

ठळक मुद्देफांद्या तुटल्या, वीजवाहिन्या विस्कळीत, अर्ध्याअधिक शहराची वीज गूल, पाच दुचाकींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तौक्ते वादळामुळे झालेल्या हवामानशास्त्रीय बदलाने रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला. अनेक भागांतील वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली कार दबली, काही भागातील टिनपत्रे उडाली, जाहिरातीची फलके पडली. झाडांच्या फांद्यांमुळे विद्युत तारा तुटल्या. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागालादेखील या वादळाने तडाखा दिला.  शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली. याशिवाय सायन्सकोर शाळेवर छपराची टिनपत्रे उडाली. विभागीय क्रीडा संकुलातील झाडांच्या फांद्या तुटल्या अन् शेडचे टिन वाकले. अनेक भागात झाडांखाली फळांचा खच लागला होता. बडनेरा शहरातही वादळी वाऱ्याचा फटका बसला. रेल्वे पुलावरील जाहिरातीचे फलक कोसळून खाली पडले. सीमेंट रस्तेनिर्मितीच्या कामांना तूर्त ब्रेक लागला आहे. भातकुली शहरातही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळासह पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. अनेक परिसरातून रस्त्याने पाणी वाहिले. वादळ शमताच मान्सूनपूर्वीच्या पावसाचा बच्चेकंपनीने आनंद लुटला. संचारबंदी असल्याने रस्त्यांवर तुरळक वाहन असल्याने कुठलेच नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. 

२२ पर्यंत ढगाळ वातावरण राहणार कायमअरबी समुद्रातील चक्रीवादळ तसेच विदर्भावर असलेले चक्राकार वारे आणि अन्य हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात पुढील पाच दिवस कमी-जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण २२ तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात विशेष बदल नसल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

पावसानंतर अंगाला लागल्या घामाच्या धारावेगवान वाऱ्यांनी धडकी भरवली, त्यानंतरच्या पावसामुळे काही मिनिटांसाठी गारवा तयार झाला. मात्र, दुपारी २ पासून पुन्हा सूर्याने दर्शन दिले. यादरम्यानच्या काळात हवा वाहत नसल्याने दमट वातावरणाचा अनुभव  अमरावतीकरांनी घेतला. अंगावरून घामाच्या धारा वाहत असताना, वीज गूल झाल्याने प्रत्येक क्षण जिवाची तगमग वाढवित होता.   राजकमल, एल.आय.सी. श्रीकृष्ण पेठ, मोरबाग, वडाळी, बडनेरा, टाऊन-३ आणि लक्ष्मीनगर फीडरवरून शहराला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महावितरणचे फोन खणखणत होते. 

 

टॅग्स :Rainपाऊस