शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

वादळाचा शहराला तडाखा, झाडांखाली दबल्या कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली.

ठळक मुद्देफांद्या तुटल्या, वीजवाहिन्या विस्कळीत, अर्ध्याअधिक शहराची वीज गूल, पाच दुचाकींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तौक्ते वादळामुळे झालेल्या हवामानशास्त्रीय बदलाने रविवारी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने शहराला चांगलाच तडाखा दिला. अनेक भागांतील वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली कार दबली, काही भागातील टिनपत्रे उडाली, जाहिरातीची फलके पडली. झाडांच्या फांद्यांमुळे विद्युत तारा तुटल्या. अर्ध्याअधिक शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागालादेखील या वादळाने तडाखा दिला.  शहरात दुपारी १.१० पासून सुमारे २० मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. कॅम्प परिसरात झाड पडल्याने त्याखाली कार दबली. राधानगरातदेखील झाड पडल्याने कार दबल्याचे घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली. याशिवाय पीडीएमएमसी मार्गावर फांद्या पडल्याने विद्युत तारा तुटल्या. रामपुरी कॅम्प भागात हीच स्थिती दिसून आली. याशिवाय सायन्सकोर शाळेवर छपराची टिनपत्रे उडाली. विभागीय क्रीडा संकुलातील झाडांच्या फांद्या तुटल्या अन् शेडचे टिन वाकले. अनेक भागात झाडांखाली फळांचा खच लागला होता. बडनेरा शहरातही वादळी वाऱ्याचा फटका बसला. रेल्वे पुलावरील जाहिरातीचे फलक कोसळून खाली पडले. सीमेंट रस्तेनिर्मितीच्या कामांना तूर्त ब्रेक लागला आहे. भातकुली शहरातही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळासह पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. अनेक परिसरातून रस्त्याने पाणी वाहिले. वादळ शमताच मान्सूनपूर्वीच्या पावसाचा बच्चेकंपनीने आनंद लुटला. संचारबंदी असल्याने रस्त्यांवर तुरळक वाहन असल्याने कुठलेच नुकसान झाले नसल्याचे दिसून आले. 

२२ पर्यंत ढगाळ वातावरण राहणार कायमअरबी समुद्रातील चक्रीवादळ तसेच विदर्भावर असलेले चक्राकार वारे आणि अन्य हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात पुढील पाच दिवस कमी-जास्त प्रमाणात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण २२ तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात विशेष बदल नसल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

पावसानंतर अंगाला लागल्या घामाच्या धारावेगवान वाऱ्यांनी धडकी भरवली, त्यानंतरच्या पावसामुळे काही मिनिटांसाठी गारवा तयार झाला. मात्र, दुपारी २ पासून पुन्हा सूर्याने दर्शन दिले. यादरम्यानच्या काळात हवा वाहत नसल्याने दमट वातावरणाचा अनुभव  अमरावतीकरांनी घेतला. अंगावरून घामाच्या धारा वाहत असताना, वीज गूल झाल्याने प्रत्येक क्षण जिवाची तगमग वाढवित होता.   राजकमल, एल.आय.सी. श्रीकृष्ण पेठ, मोरबाग, वडाळी, बडनेरा, टाऊन-३ आणि लक्ष्मीनगर फीडरवरून शहराला होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे महावितरणचे फोन खणखणत होते. 

 

टॅग्स :Rainपाऊस