शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
8
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
9
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
10
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
11
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
12
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
13
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
14
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
15
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
16
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
17
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
18
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
19
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
20
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले

खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची साठवण करा

By admin | Updated: May 14, 2015 00:04 IST

मागील खरीप हंगामात पाऊस उशिरा आल्याने व शेंगा भरताना पिकावर ताण पडल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्तन्नात...

आवाहन : कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचनाअमरावती : मागील खरीप हंगामात पाऊस उशिरा आल्याने व शेंगा भरताना पिकावर ताण पडल्याने सोयाबीनच्या सरासरी उत्तन्नात घट झाली. त्यामुळे बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ वाण आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:जवळील बियाणे वापरण्यासाठी कृषी विभागाद्वारे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी विभागाने दिलेल्या सूचनेनुसार मागील दोन वर्षांत खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या हंगामात बियाणे म्हणुन वापरावे. स्वत:कडील बियाणे शेतकऱ्यांनी वापरल्यास बियाणे खर्चात बचत होईल. बियाणे साठवताना बियाण्याच्या आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्या पेक्षा जास्त नसावे. सोयाबीण बियाणे अत्यंत नाजूक असुन त्याचे बाहय आवरण पातळ असते. व बियाणांतील बिजांकुर बाहय आवरणाच्या लगत असतात. त्यामुळे बियाणास इजा पोहचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावे. बियाणे साठवतांना व पोत्यांची थप्पी ६ ते ८ थरांची किंवा ७ फुटापेक्षा जास्त नसावी, असे कृषी आयुक्त पुणे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.