शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

साठवण तलाव फुटला - मासे अन् मत्स्यबीज गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:38 IST

तालुक्यातील सांगळुद येथील जलसंधारण विभागाचे शेततळे वजा साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने सुमारे २०० एकर जमीन तलावसदृश झाल्याने पिके नेस्तनाबूत झालीत, शिवाय साठवण तलावातील मत्स्यबीज व लाखो रुपयांचे मासे वाहून गेले.

ठळक मुद्देसांगळुद येथील घटना : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यातील सांगळुद येथील जलसंधारण विभागाचे शेततळे वजा साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने सुमारे २०० एकर जमीन तलावसदृश झाल्याने पिके नेस्तनाबूत झालीत, शिवाय साठवण तलावातील मत्स्यबीज व लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.भागडी नाल्यालगतचा मासोळी तलाव म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या साठवण तलावात सांगळुद येथील युवा शेतकरी विनय गावंडे, शरद आठवले व वीरेंद्र मोहोड यांनी शासनाकडे शुल्क जमा करून मत्स्योत्पादन घेण्यासाठी शेततळ्यात लाखो रुपयांचे मत्स्यबीजे टाकली. त्यातून अर्धा ते एक किलो वजनाच्या शेकडो मासोळ्या तयार झाल्या.साठवण तलावात क्षमतेपेक्षा अधिक जलसंचय झाल्याने ते मासे वाहून गेले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगळूद येथे दहा एकराच्या विस्तीर्ण परिसरात जलसंधारण विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मासोळी प्रकल्पाच्या तलावाचे इनलेट व आऊटलेट फुटल्याने हा कहर उडाला. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.नुकसानभरपाईची मागणीमासोळी तलाव फुटल्याने आजूबाजूच्या शेतामधील पीकही खरडून वाहून गेले. महसूल विभागाने तात्काळ उपाय योजना करून सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून हेक्टरी २५ हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी रवि कोरडे, प्रवीण कावरे, असलम देशमुख, ओमप्रकाश कंकाले, प्यारेलाल वर्मा, नूर अहमद देशमुख, जगत जावरकर, गणेश गिरे आदींनी केली आहे. सासन रामापूर व सासन बु. या दोन गावांना जोेडणारा पूल पाण्याखाली आल्याने दोन्ही बाजूकडील संपर्क तुटला.भाडेतत्त्वावर घेतला, पावसाने हिरावलागावातील तीन युवकांना हा तलाव भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. या तलावात भागडी नाल्याचे पाणी साठविले जाते. ४ ते ५ लाख रुपये खर्च करून त्या युवकांनी तलावात मत्स्यबीज वाढविले होते. तालुक्यात संततधार बरसणाºया पावसाने परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. भागडी नाला तुडुंब भरून वाहिल्याने साठवण तलावात पाण्याचा मोठा साठा झाला. पाण्याच्या अत्याधिक दाबाने तलावाचे इनलेट व आऊटलेट फुटले. त्यामुळे तलावातील लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर