शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

साठवण तलाव फुटला - मासे अन् मत्स्यबीज गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:38 IST

तालुक्यातील सांगळुद येथील जलसंधारण विभागाचे शेततळे वजा साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने सुमारे २०० एकर जमीन तलावसदृश झाल्याने पिके नेस्तनाबूत झालीत, शिवाय साठवण तलावातील मत्स्यबीज व लाखो रुपयांचे मासे वाहून गेले.

ठळक मुद्देसांगळुद येथील घटना : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यातील सांगळुद येथील जलसंधारण विभागाचे शेततळे वजा साठवण तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने सुमारे २०० एकर जमीन तलावसदृश झाल्याने पिके नेस्तनाबूत झालीत, शिवाय साठवण तलावातील मत्स्यबीज व लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.भागडी नाल्यालगतचा मासोळी तलाव म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या साठवण तलावात सांगळुद येथील युवा शेतकरी विनय गावंडे, शरद आठवले व वीरेंद्र मोहोड यांनी शासनाकडे शुल्क जमा करून मत्स्योत्पादन घेण्यासाठी शेततळ्यात लाखो रुपयांचे मत्स्यबीजे टाकली. त्यातून अर्धा ते एक किलो वजनाच्या शेकडो मासोळ्या तयार झाल्या.साठवण तलावात क्षमतेपेक्षा अधिक जलसंचय झाल्याने ते मासे वाहून गेले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगळूद येथे दहा एकराच्या विस्तीर्ण परिसरात जलसंधारण विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मासोळी प्रकल्पाच्या तलावाचे इनलेट व आऊटलेट फुटल्याने हा कहर उडाला. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.नुकसानभरपाईची मागणीमासोळी तलाव फुटल्याने आजूबाजूच्या शेतामधील पीकही खरडून वाहून गेले. महसूल विभागाने तात्काळ उपाय योजना करून सर्व शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून हेक्टरी २५ हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी रवि कोरडे, प्रवीण कावरे, असलम देशमुख, ओमप्रकाश कंकाले, प्यारेलाल वर्मा, नूर अहमद देशमुख, जगत जावरकर, गणेश गिरे आदींनी केली आहे. सासन रामापूर व सासन बु. या दोन गावांना जोेडणारा पूल पाण्याखाली आल्याने दोन्ही बाजूकडील संपर्क तुटला.भाडेतत्त्वावर घेतला, पावसाने हिरावलागावातील तीन युवकांना हा तलाव भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. या तलावात भागडी नाल्याचे पाणी साठविले जाते. ४ ते ५ लाख रुपये खर्च करून त्या युवकांनी तलावात मत्स्यबीज वाढविले होते. तालुक्यात संततधार बरसणाºया पावसाने परिसरातील नाल्यांना पूर आला आहे. भागडी नाला तुडुंब भरून वाहिल्याने साठवण तलावात पाण्याचा मोठा साठा झाला. पाण्याच्या अत्याधिक दाबाने तलावाचे इनलेट व आऊटलेट फुटले. त्यामुळे तलावातील लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर