शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

अचलपुरातील बालविवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:11 IST

अचलपूर : जिल्ह्यातील बाल विवाहाचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश ...

अचलपूर : जिल्ह्यातील बाल विवाहाचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. दीड महिन्यांत सहा बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले. शुक्रवारी पुन्हा अचलपूरमध्ये १५ वर्षीय बलिकेचा विवाह रोखण्यात आला.

सदर बालविवाह २६ एप्रिल रोजी होत असल्याची तक्रार बाल संरक्षण कक्ष आणि अचलपूर पोलिसांना मिळाली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांच्या आदेशानव्ये जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले आणि बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांनी चाईल्ड लाईनचे अमित कपूर व अजय देशमुख यांच्यासमवेत अचलपूर गाठले. येथील पोलीस ठाण्यामधून मदत घेऊन वधुपक्षाकडे जाऊन मुलीच्या आई-वडिलांसोबत वरपक्षाची बैठक घेण्यात आली तसेच त्यांच्याकडून मुलीचे १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचे हमीपत्र लिहून घेण्यात आले. विवाह केल्यास गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची तंबी देण्यात आली.

अचलपूर पोलीस ठाणे, बाल संरक्षण कक्ष, अमरावती व चाईल्ड लाईन प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुलींचे अल्पवयात विवाह होऊ नये, याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी कर्मचारी कठोर मेहनत घेत आहेत. सातत्याने संबधित स्टेक होल्डरसोबत संपर्कात आहेत. यामुळेच बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश येत असल्याचे मत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वीच मोर्शी तालुक्यात दोन बहिणींचे बालविवाह रोखण्यात आले.