शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय विरोधामुळे नरसरी गावाची होणारी बदनामी थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST

अचलपूर : गौरखेडा कुंभी गट ग्रामपंचायत अंतर्गत नरसरी गावाची बदनामी राजकीय हेतूने प्रेरित काही ग्रामपंचायत सदस्य करीत असल्याचा आरोप ...

अचलपूर : गौरखेडा कुंभी गट ग्रामपंचायत अंतर्गत नरसरी गावाची बदनामी राजकीय हेतूने प्रेरित काही ग्रामपंचायत सदस्य करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही बदनामी थांबविण्याचे निवेदन अचलपूरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा तथा गौरखेडा कुंभीच्या ग्रामपंचायत सचिवांना देण्यात आले.

नरसारी गावातील स्मशानभूमीलगत असलेले तळे, ज्यात पाण्याचा कुठलाही स्रोत नव्हता, पावसाळ्यात त्या शेततळ्यात पाणी जमा होत नव्हते तसेच त्यात व आजूबाजूला काटेरी झुडपे अवास्तव वाढलेली होती. या तळ्यात रानडुकरांचा मुक्काम असल्यामुळे लगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत होते. विशेष म्हणजे, या तळ्याचा कोणताही फायदा गाववासीयांना होत नव्हता. त्यामुळे गावातीलच तरुण मंडळींनी सर्वांना विश्वासात घेऊन तळ्याची साफसफाई करून भरती टाकली. काटेरी झुडपे कापून त्या ठिकाणी खेळण्याचे मैदान बनविण्याचे ठरविले. त्याच प्रमाणे मैदानाच्या आजूबाजूला वृक्षारोपण करून फायदेशीर वृक्ष लावण्याचे ठरविले. तळ्यातील तोडलेली काटेरी झुडपे, बाभळी स्मशानभूमीला देण्यात आली. तरुणांनी लोकवर्गणी करून तळ्याच्या ठिकाणी मैदान बनविले. त्या ठिकाणी तरुण मंडळी खेळू लागली. मात्र, विरोधी पक्षाच्या राजकीय मंडळींनी याची तक्रार ग्रामपंचायतीमध्ये नोंदविली. त्यामुळे चांगले कामे केलेल्या तरुणांची व गावाची बदनामी झाली. ही खोटी बदनामी थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.