शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

संत्रा, केळी, कपाशीवर आघात

By admin | Updated: October 1, 2014 23:16 IST

नैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत

अरुण पटोकार - पथ्रोटनैसर्गिक आपत्तींमुळे २०१४ हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरले. मृग नक्षत्राच्या सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी धक्क्यावर धक्के दिले. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकला. कर्जाच्या विवंचनेत त्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील एका संत्राबागाईतदाराने आत्महत्या केल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे. दीड महिना पावसाने दांडी मारल्याने पेरणीला विलंब झाला. परिणामी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे. कशीबशी उशिराने पेरणी आटोपली. पण, लगेच जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. हा निसर्गाने दिलेला पहिला धक्का. दुबार पेरणी करून शेतकऱ्यांनी कसेबसे सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक उभे केले. त्यावर पुन्हा निसर्गाचा कोप झाला. सोयाबीनवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पीक बुडण्याच्या मार्गावर आहे. मर रोगाने तुरीची झाडे सुकत आहेत. कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांच्या फांद्या वाळत आहेत. हा शेतकऱ्यांना निसर्गाने दिलेला दुसरा धक्का. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसामुळे पथ्रोट, पांढरी खानमपूर, अंजनगाव सुर्जी, परिसरातील काही केळीबागा भुईसपाट झाल्या. त्यामध्ये मोजक्याच बागाईतदारांच्या बागा सुदैवाने बचावल्या. पण, निसर्गाने त्यांच्यावर घाला घातलाच. शिल्लक राहिलेल्या केळीच्या बागांवर दव व अज्ञात रोगाने आक्रमण केले. यामुळे बागेतील लहान-लहान व अर्धवट पिकलेली केळी पिवळी व काळी पडली आहेत. झाडांवरील घडही तुटून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा तिसरा धक्का पोहचला आहे. संत्रा बागाईतदारांची स्थिती त्याहूनही बिकट आहे. वातावरणातील बदल व अज्ञात रोगामुळे मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वच संत्रा बागांमधील हिरवी व पिवळी संत्री गळून पडू लागली आहेत. संत्रा हे रोखीचे पीक आहे. त्यामुळे या पिकाच्या भरवशावर मोठमोठे व्यवहार, कर्जांची देवाणघेवाण आदी केले जातात. मात्र, शासनाकडून नुकसान भरपाई देताना टाळाटाळ केली जाते. शेतकऱ्याला वरून निसर्गाचा व खालून शासनाचा मार सोसावा लागतो. ही शेतकऱ्यांची कुचंबणाच नाही काय, असा सवाल उपस्थित होत आहे.