शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

वेदनेचा डंख साहित्यात सत्त्व अन् स्वत्व उमटविते: गोपालकृष्ण मांडवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 17:55 IST

वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे.

अमरावती : वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे. त्यातून सामाजिक ममत्वाचा निर्झर अखंड प्रवाहित होत राहावा, अशी प्रांजळ अपेक्षा प्रथम नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ, अमरावतीद्वारे येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी आयोजित प्रथम महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शरद ढोबळे, साहित्य अभ्यासक प्रकाश नागपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव बिडवे, शिवलिंग काटेकर, संजय येऊलकर, राजेंद्र अमृतकर, गोपाल कडूकर, श्याम आस्करकर, कल्पना निंबोकर, सुधीर राऊत, विशाल कान्हेरकर आदी उपस्थित होते.

नाभिक समाजाने आपले स्वत:चे साहित्य संमेलन घ्यावे, ही घटनाच मुळी साहित्यविश्वाला अचंबित करणारी आहे. साहित्य पोट भरल्यावर जन्माला येते, हा प्रवाद अमान्य आहे. असे असते, तर संत सेना महाराज, संत नगाजी महाराज यांची प्रतिभा फुलली नसती; गरिबी अन् अवहेलनांचे चटके सोसणारे राम नगरकर महाराष्ट्राचे लाडके झाले नसते, असे मांडवकर म्हणाले. आजवर कधी अनुभवली नाही अशी संक्रमणावस्था आपण अनुभवत आहोत. यातून स्वत:च्या हक्काची स्पेस निर्माण करण्याचे काम आपण करतोय. या बीजारोपणातून नाभिक समाजाचे सुदृढ अन् समाजहितैषी साहित्य उद्या निर्माण होईल, अशी ग्वाही मांडवकर यांनी दिली.

वंचित समाजघटकांपर्यंत सुखाची आणि समृद्धीची किरणं जेव्हा पोहचत नाहीत, तेव्हा विषमतेला सुरुवात होऊन समाजात दरी निर्माण होते. ती बुजविण्याचे काम या साहित्य संममेलनांच्या व्यासपीठावरून आपणास करावे लागेल, असे आवाहन मांडवकर यांनी केले. याप्रसंगी मुकुंद धजेकर, सुधीर राऊत, सुनीता वरणकर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विशाल कन्हेकर, संचालन प्रवीण बोपूलकर, वैष्णवी अतकरे यांनी केले. 

नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी

नाभिक समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासनाने नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी अन् त्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव या संमेलनात घेतला जावा, अशी अपेक्षा संमेनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. त्याचे सर्वांनी स्वागत केले.

केवळ लेखन नव्हे, कृतीही महत्त्वाची

लेखकांनी केवळ लेखन न करता कृतीदेखील करावी. तेव्हाच लेखन ही माझी कृती आहे, असे लेखक म्हणू शकेल. समाजातील कलावंत, लेखक, पत्रकारांकडून कृतिशील व्यवहाराची अपेक्षा आहे, असे संमेलनाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती