शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वेदनेचा डंख साहित्यात सत्त्व अन् स्वत्व उमटविते: गोपालकृष्ण मांडवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 17:55 IST

वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे.

अमरावती : वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे. त्यातून सामाजिक ममत्वाचा निर्झर अखंड प्रवाहित होत राहावा, अशी प्रांजळ अपेक्षा प्रथम नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ, अमरावतीद्वारे येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी आयोजित प्रथम महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शरद ढोबळे, साहित्य अभ्यासक प्रकाश नागपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव बिडवे, शिवलिंग काटेकर, संजय येऊलकर, राजेंद्र अमृतकर, गोपाल कडूकर, श्याम आस्करकर, कल्पना निंबोकर, सुधीर राऊत, विशाल कान्हेरकर आदी उपस्थित होते.

नाभिक समाजाने आपले स्वत:चे साहित्य संमेलन घ्यावे, ही घटनाच मुळी साहित्यविश्वाला अचंबित करणारी आहे. साहित्य पोट भरल्यावर जन्माला येते, हा प्रवाद अमान्य आहे. असे असते, तर संत सेना महाराज, संत नगाजी महाराज यांची प्रतिभा फुलली नसती; गरिबी अन् अवहेलनांचे चटके सोसणारे राम नगरकर महाराष्ट्राचे लाडके झाले नसते, असे मांडवकर म्हणाले. आजवर कधी अनुभवली नाही अशी संक्रमणावस्था आपण अनुभवत आहोत. यातून स्वत:च्या हक्काची स्पेस निर्माण करण्याचे काम आपण करतोय. या बीजारोपणातून नाभिक समाजाचे सुदृढ अन् समाजहितैषी साहित्य उद्या निर्माण होईल, अशी ग्वाही मांडवकर यांनी दिली.

वंचित समाजघटकांपर्यंत सुखाची आणि समृद्धीची किरणं जेव्हा पोहचत नाहीत, तेव्हा विषमतेला सुरुवात होऊन समाजात दरी निर्माण होते. ती बुजविण्याचे काम या साहित्य संममेलनांच्या व्यासपीठावरून आपणास करावे लागेल, असे आवाहन मांडवकर यांनी केले. याप्रसंगी मुकुंद धजेकर, सुधीर राऊत, सुनीता वरणकर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विशाल कन्हेकर, संचालन प्रवीण बोपूलकर, वैष्णवी अतकरे यांनी केले. 

नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी

नाभिक समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासनाने नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी अन् त्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव या संमेलनात घेतला जावा, अशी अपेक्षा संमेनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. त्याचे सर्वांनी स्वागत केले.

केवळ लेखन नव्हे, कृतीही महत्त्वाची

लेखकांनी केवळ लेखन न करता कृतीदेखील करावी. तेव्हाच लेखन ही माझी कृती आहे, असे लेखक म्हणू शकेल. समाजातील कलावंत, लेखक, पत्रकारांकडून कृतिशील व्यवहाराची अपेक्षा आहे, असे संमेलनाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती