शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

वेदनेचा डंख साहित्यात सत्त्व अन् स्वत्व उमटविते: गोपालकृष्ण मांडवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 17:55 IST

वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे.

अमरावती : वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे. त्यातून सामाजिक ममत्वाचा निर्झर अखंड प्रवाहित होत राहावा, अशी प्रांजळ अपेक्षा प्रथम नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ, अमरावतीद्वारे येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी आयोजित प्रथम महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शरद ढोबळे, साहित्य अभ्यासक प्रकाश नागपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव बिडवे, शिवलिंग काटेकर, संजय येऊलकर, राजेंद्र अमृतकर, गोपाल कडूकर, श्याम आस्करकर, कल्पना निंबोकर, सुधीर राऊत, विशाल कान्हेरकर आदी उपस्थित होते.

नाभिक समाजाने आपले स्वत:चे साहित्य संमेलन घ्यावे, ही घटनाच मुळी साहित्यविश्वाला अचंबित करणारी आहे. साहित्य पोट भरल्यावर जन्माला येते, हा प्रवाद अमान्य आहे. असे असते, तर संत सेना महाराज, संत नगाजी महाराज यांची प्रतिभा फुलली नसती; गरिबी अन् अवहेलनांचे चटके सोसणारे राम नगरकर महाराष्ट्राचे लाडके झाले नसते, असे मांडवकर म्हणाले. आजवर कधी अनुभवली नाही अशी संक्रमणावस्था आपण अनुभवत आहोत. यातून स्वत:च्या हक्काची स्पेस निर्माण करण्याचे काम आपण करतोय. या बीजारोपणातून नाभिक समाजाचे सुदृढ अन् समाजहितैषी साहित्य उद्या निर्माण होईल, अशी ग्वाही मांडवकर यांनी दिली.

वंचित समाजघटकांपर्यंत सुखाची आणि समृद्धीची किरणं जेव्हा पोहचत नाहीत, तेव्हा विषमतेला सुरुवात होऊन समाजात दरी निर्माण होते. ती बुजविण्याचे काम या साहित्य संममेलनांच्या व्यासपीठावरून आपणास करावे लागेल, असे आवाहन मांडवकर यांनी केले. याप्रसंगी मुकुंद धजेकर, सुधीर राऊत, सुनीता वरणकर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विशाल कन्हेकर, संचालन प्रवीण बोपूलकर, वैष्णवी अतकरे यांनी केले. 

नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी

नाभिक समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासनाने नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी अन् त्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव या संमेलनात घेतला जावा, अशी अपेक्षा संमेनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. त्याचे सर्वांनी स्वागत केले.

केवळ लेखन नव्हे, कृतीही महत्त्वाची

लेखकांनी केवळ लेखन न करता कृतीदेखील करावी. तेव्हाच लेखन ही माझी कृती आहे, असे लेखक म्हणू शकेल. समाजातील कलावंत, लेखक, पत्रकारांकडून कृतिशील व्यवहाराची अपेक्षा आहे, असे संमेलनाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती