शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वेदनेचा डंख साहित्यात सत्त्व अन् स्वत्व उमटविते: गोपालकृष्ण मांडवकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 17:55 IST

वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे.

अमरावती : वेदनांचे डंख बसलेली व समाजहिताचे भान राखणारी प्रतिभा साहित्यात सत्त्व अन् स्वत्त्व उमटविते. या संमेलनाच्या माध्यमातून तमाम साहित्यिकांच्या लेखणीतून हेच उतरावे. त्यातून सामाजिक ममत्वाचा निर्झर अखंड प्रवाहित होत राहावा, अशी प्रांजळ अपेक्षा प्रथम नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ, अमरावतीद्वारे येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी आयोजित प्रथम महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष शरद ढोबळे, साहित्य अभ्यासक प्रकाश नागपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तमराव बिडवे, शिवलिंग काटेकर, संजय येऊलकर, राजेंद्र अमृतकर, गोपाल कडूकर, श्याम आस्करकर, कल्पना निंबोकर, सुधीर राऊत, विशाल कान्हेरकर आदी उपस्थित होते.

नाभिक समाजाने आपले स्वत:चे साहित्य संमेलन घ्यावे, ही घटनाच मुळी साहित्यविश्वाला अचंबित करणारी आहे. साहित्य पोट भरल्यावर जन्माला येते, हा प्रवाद अमान्य आहे. असे असते, तर संत सेना महाराज, संत नगाजी महाराज यांची प्रतिभा फुलली नसती; गरिबी अन् अवहेलनांचे चटके सोसणारे राम नगरकर महाराष्ट्राचे लाडके झाले नसते, असे मांडवकर म्हणाले. आजवर कधी अनुभवली नाही अशी संक्रमणावस्था आपण अनुभवत आहोत. यातून स्वत:च्या हक्काची स्पेस निर्माण करण्याचे काम आपण करतोय. या बीजारोपणातून नाभिक समाजाचे सुदृढ अन् समाजहितैषी साहित्य उद्या निर्माण होईल, अशी ग्वाही मांडवकर यांनी दिली.

वंचित समाजघटकांपर्यंत सुखाची आणि समृद्धीची किरणं जेव्हा पोहचत नाहीत, तेव्हा विषमतेला सुरुवात होऊन समाजात दरी निर्माण होते. ती बुजविण्याचे काम या साहित्य संममेलनांच्या व्यासपीठावरून आपणास करावे लागेल, असे आवाहन मांडवकर यांनी केले. याप्रसंगी मुकुंद धजेकर, सुधीर राऊत, सुनीता वरणकर यांचा सत्कार करण्यात आला, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विशाल कन्हेकर, संचालन प्रवीण बोपूलकर, वैष्णवी अतकरे यांनी केले. 

नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी

नाभिक समाजाच्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासनाने नाभिक साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करावी अन् त्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करणारा ठराव या संमेलनात घेतला जावा, अशी अपेक्षा संमेनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. त्याचे सर्वांनी स्वागत केले.

केवळ लेखन नव्हे, कृतीही महत्त्वाची

लेखकांनी केवळ लेखन न करता कृतीदेखील करावी. तेव्हाच लेखन ही माझी कृती आहे, असे लेखक म्हणू शकेल. समाजातील कलावंत, लेखक, पत्रकारांकडून कृतिशील व्यवहाराची अपेक्षा आहे, असे संमेलनाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Amravatiअमरावती