शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

अतिदुर्गम केलपानीत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम

By admin | Updated: December 11, 2014 22:58 IST

जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मेळघाटातील शेवटचे टोक असलेल्या धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या केलपानी या अतिदुर्गम गावात बुधवारी मुक्काम ठोकला.

धारणी :जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मेळघाटातील शेवटचे टोक असलेल्या धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या केलपानी या अतिदुर्गम गावात बुधवारी मुक्काम ठोकला. त्यामुळे या भागातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी बुधवारी पूर्णवेळ मुक्कामी आढळून आले.जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळपासून संपूर्ण रात्र गावातील झोपडीत काढली. अमरावती, अकोला, बुलडाणा आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत अतिदुर्गम मेळघाटातील धारगड व्याघ्र प्रकल्पांतर्गत केलपानी हे जिल्ह्याचे शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे चारशे कुटुंबाची लोकवस्ती असून १३०० लोकसंख्येचे हे गाव आहे आहे. येथील २५० कुटुंबांचे पुनर्वसन भिलमलकापूर (अकोट)येथे केले आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत मूलभूत सोई-सुविधा पुरविल्या जात नसल्याचे गावकऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आयोजित सभेत सांगितले. पुनर्वसनासाठी पूर्ण तयारी दर्शवून त्यांच्या काही मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांच्या मागण्यांमध्ये उर्वरित १५० कुटुंबांना दहिखेड येथे पुनर्वसित करावे, तेथे शासनाने स्वत: खर्च करून योग्य त्या मूलभूत सोई, सुविधा जसे शाळा, वीज, पाणी, रस्ते, आरोग्य आदी सुुविधा उपलब्ध करून द्याव्यात, केलपानी येथे ५० वर्षांपासून रहिवासी असलेल्या कुटुंबांना विनाअट पात्र करावे, मेळघाटातील संभाव्य नोकरभरतीमध्ये या कुटुंबांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्राधान्य द्यावे, प्रकल्पग्रस्तांना एकरकमी रक्कम दिली जावी, गावातील अनाथ मुले, विधवांना देखील पुनर्वसनाचा लाभ मिळावा, शेतीच्या बदल्यात शेती आणि घरांचे मूल्यांकन करून त्याचा मोबदला शासनाने पुनर्वसनाच्या रकमेतून न देता स्वतंत्रपणे द्यावा, वनहक्क कायद्यान्वये २००७ मध्ये ठरवून दिलेली कुुटुंबनिहाय १० लाखांची रक्कम वाढवून देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी केलपानी गावातील सरपंच सीमा खांडवाये, सौदागर कांदे, नरहरी आंधळे, रमेश सोनोने, सुभाष बेठेकर, मौजीलाल जामुनकर, बिरजू मावस्कर, दिलीप कास्देकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ठाणेदार नितीन गवारे, व्याघ्र अधिकारी नीळकंठ अलोणे, अनिल हागोणे, अळसपुरे, आनंद इंगळे यांचीही उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)