शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदर्भात पाणवठ्यांवर ‘जागते रहो’, व्याघ्र प्रकल्पांवर तस्करांची नजर; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून सूचना

By गणेश वासनिक | Updated: March 9, 2024 19:04 IST

‘लिट्मस’ पेपरचा नियमित करा वापर; नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन कर्मचारी तैनात

अमरावती : उन्हाळ्यात वाघांना तृष्णा भागविण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नेमकी हीच बाब हेरून व्याघ्र तस्कर हे वाघांच्या शिकारीसाठी सज्ज होत असतात. विशेषत: एप्रिल, मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांवर वाघांच्या विषप्रयोगाची भीती असून, विदर्भातील वन कर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’च्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक ‘अलर्ट’ झाले आहेत.

व्याघ्र तस्करांकडून वाघांच्या शिकारीसाठी जंगलात लोखंडी ट्रॅप लावणे, पाणवठ्यावर विषप्रयोेग करण्याच्या घटना यापूर्वी निदर्शनास आल्या आहेत. तस्करांची ही मोहीम फत्ते झाल्यास वाघांच्या विविध अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री केली जाते. दिल्ली, नेपाळ मार्गे चीनपर्यंत व्याघ्र तस्करीचे कनेक्शन असल्याचे दिल्ली येथील वन्यजीव नियंत्रण ब्युरोने यापूर्वीच उघडकीस आणले आहे. विदर्भातील वाघांवर मध्य प्रदेशातील बहेलिया, तर पंजाबच्या बावरिया टोळ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर, टिपेश्वर या अभयारण्यानजीकच्या गावांमध्ये संशयास्पद अथवा परप्रांतीय व्यक्ती दिसल्यास स्थानिक पोलिसांना तत्काळ माहिती देण्याच्या सूचना व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याची विश्वसनीय माहिती आहे. गतवर्षी २७ जून २०२३ रोजी गडचिरोलीनजकीच्या आंबेशिवणी येथे व्याघ्र शिकारीच्या साहित्यासह संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, हे विशेष....‘त्या’ पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा

व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यात पाणी समस्या उद्भवल्यास प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. सोलर नसलेल्या पाणवठ्यावर वाघांची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचे मृत्यू होता कामा नयेत, अशी गाइडलाइन आहे. पाणवठ्यांच्या नियमित तपासणीसाठी लिट्मस पेपरचा वापर अनिवार्य केला आहे, तर नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वनकर्मचारी तैनात करण्याच्या सूचना आहेत.पाणवठ्यांची लिटमस पेपरने नियमित तपासणी केली जाते; मात्र उन्हाळ्यात याविषयी विशेष काळजी घेतली जाते. ज्या ठिकाणी सोलर वीज उपलब्ध नाही, अशा पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणवठ्यांची देखभाल, तपासणीसाठी बीटनिहाय वनकर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. - मनोजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल.

टॅग्स :Amravatiअमरावती