शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ईव्हीएम विरोधात राज्यभरात लढा उभा करणार : आनंदराज आंबेडकर

By उज्वल भालेकर | Updated: January 3, 2024 19:11 IST

अमरावती लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, इंडिया आघाडीशी चर्चा सुरु

उज्वल भालेकर / अमरावती: सध्या देशभरात नागरिकांमध्ये ईव्हीएमविरोधात संभ्रम आहे. त्यामुळे आगामी निवडणुका या सर्व बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहे; परंतु सत्तेत असलेले भाजपचे सरकार हे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे सध्या भाजपला मिळणारा विजय हा त्यांचा विजय नसून ईव्हीएमचा विजय आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यभरात ईव्हीएमविरोधात लढा पुकारणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी पत्र परिषदेतून दिली.

आनंदराज आंबेडकरांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी रिपब्लिकन सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याअनुषंगाने आनंदराज आंबेडकर हे मागील दोन वर्षांपासून ते सातत्याने अमरावतीचा दौरा करत आहेत. भीमा कोरेगाव शौर्यदिनिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त आनंदराज आंबेडकर हे दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेतून माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले, सध्या देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे होताना दिसून येत असून, सर्व सामान्य नागरिकांच्या विरोधातील कायदे संसदेत पारित करण्यात येत आहेेत. त्यामुळे देशातील लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. यासाठी आम्ही त्यांना लोकसभेसाठी अमरावतीच्या एकाच जागेची मागणी करत आहोत आणि त्याअनुषंगाने इंडिया आघाडीतील काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चादेखील सुरू आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात शरद पवार यांचीदेखील भेट घेतली आहे. त्यामुळे वेळेवर सर्व चित्र स्पष्ट होईलच; परंतु या बरोबर देशात भाजपला सत्तेबाहेर आणण्यासाठी ईव्हीएमविरोधात लढा उभारणे तितकेच महत्त्वाचे असून, लवकरच राज्यभरात हा लढा उभा करणार असल्याचेही आनंदराज आंबेडकर म्हणाले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे विनायक दुधे, सतीश सियाले, ॲड. पी.एस. खडसे, बाळासाहेब वाकोडे उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती