शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By admin | Updated: September 13, 2015 00:12 IST

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

अचलपूर : अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. हा मार्ग शहराबाहेरून बायपास काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चंद्रपूर भुगूस ते अमरावती व्हाया परतवाडा ते भोकरबर्डी असा २१६ किलोमिटर लांबीचा हा राज्यमहामार्ग क्रमांक १४ आहे. अमरावती ते भोकरबर्डीपर्यंत साधारण १२९ किलोमीटर लांब आहे. हा महामार्ग भोकरबर्डीपासून पुढे मध्यप्रदेश ते बऱ्हाणपूरपर्यंत जातो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक राहते. मोठ-मोठी जड वाहने या रस्त्यावरून धावतात. अचलपूर नाका ते चिखलदरा स्टॉपपर्यंत हा मार्ग दुचाकीस्वार, विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांच्यासह आदींसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दररोज लहान मोठे अपघात ठरलेले असतात. यापूर्वी अपघातात ठार झाल्याच्या घटनाही या रस्त्यावर घडल्या आहेत. मोकाट जनावरांनाही वाहनांची धडक बसून गंभीर जखमी झाल्याची उदाहरणे असून प्रसंगी जीवही गेले आहेत. अचलपूर नाक्यापासून चिखलदरा स्टॉपपर्यंत याचे अंतर साधारणत: ७ ते ८ किलोमिटर असू शकते. यादरम्यान हातगाडीवाले, पानटपरी, चहा कॅन्टींगवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. निवासी रस्ता अरुंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना बऱ्याच वेळा नोटीस देण्यात आल्यात. दोनतीन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. पण काही दिवसांनी ते ‘जैसे थे’ होते. काही बडे दुकानदार आपल्या दुकानातील विक्रीचा माल दुकानाबाहेर रस्त्यालगत आणून ठेवतात. तसेच दुकानदारांना पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावरुच खेटून ग्राहकांची वाहने उभी असतात. बऱ्याचदा वाहने रस्त्यावर उभी असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी होते. वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागते. (शहर प्रतिनिधी)