शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By admin | Updated: September 13, 2015 00:12 IST

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

अचलपूर : अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. हा मार्ग शहराबाहेरून बायपास काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चंद्रपूर भुगूस ते अमरावती व्हाया परतवाडा ते भोकरबर्डी असा २१६ किलोमिटर लांबीचा हा राज्यमहामार्ग क्रमांक १४ आहे. अमरावती ते भोकरबर्डीपर्यंत साधारण १२९ किलोमीटर लांब आहे. हा महामार्ग भोकरबर्डीपासून पुढे मध्यप्रदेश ते बऱ्हाणपूरपर्यंत जातो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक राहते. मोठ-मोठी जड वाहने या रस्त्यावरून धावतात. अचलपूर नाका ते चिखलदरा स्टॉपपर्यंत हा मार्ग दुचाकीस्वार, विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांच्यासह आदींसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दररोज लहान मोठे अपघात ठरलेले असतात. यापूर्वी अपघातात ठार झाल्याच्या घटनाही या रस्त्यावर घडल्या आहेत. मोकाट जनावरांनाही वाहनांची धडक बसून गंभीर जखमी झाल्याची उदाहरणे असून प्रसंगी जीवही गेले आहेत. अचलपूर नाक्यापासून चिखलदरा स्टॉपपर्यंत याचे अंतर साधारणत: ७ ते ८ किलोमिटर असू शकते. यादरम्यान हातगाडीवाले, पानटपरी, चहा कॅन्टींगवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. निवासी रस्ता अरुंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना बऱ्याच वेळा नोटीस देण्यात आल्यात. दोनतीन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. पण काही दिवसांनी ते ‘जैसे थे’ होते. काही बडे दुकानदार आपल्या दुकानातील विक्रीचा माल दुकानाबाहेर रस्त्यालगत आणून ठेवतात. तसेच दुकानदारांना पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावरुच खेटून ग्राहकांची वाहने उभी असतात. बऱ्याचदा वाहने रस्त्यावर उभी असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी होते. वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागते. (शहर प्रतिनिधी)