शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात नव्या जलकुंभ उद्घाटनाचे राजकीय नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:03 IST

बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.

ठळक मुद्देएकाच दिवशी दोनवेळा आनंदोत्सव : युवा स्वाभिमानचा जल्लोष; भाजपने भरविले पेढे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.जुनीवस्ती येथील जलकुंभाचे आयुर्मान संपुष्टात आल्यामुळे त्याच जागी शासन निधीतून नव्याने जलकुंभ साकारण्यात आले आहे. या जलकुंभाचे बांधकाम सुरू असताना बडनेरावासीयांना नवीवस्ती येथील जलकुंभातून पाणीपुरवठा व्हायचा. त्यामुळे गत सहा महिन्यांपासून पाण्याचे नियोजन कोलमडले. दरम्यान संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धडक दिली. दररोज पाणी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.पाणी वितरण सुलभमजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी २० मे रोजी बडनेरा येथील नवनिर्मित जलकुंभ सुरू केले जाईल, अशी ग्वाही युवा स्वाभिमानच्या आंदोलनकर्त्यांना दिली होती. त्याअनुषंगाने मजीप्राने रविवारी जलकुंभ सुरू करण्याचे नियोजन चालविले. तत्पूर्वी भाजप, सेना, रिपाइंचे कार्यकर्ते जलकुंभ परिसरात पोहचले. शिवराय कुळकर्णी यांनी जलकुंभ निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. अमृत योजनेतून जलकुंभाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन पाणी वितरणासाठी टाकी सज्ज झाल्याने भाजपने पेढे भरविले. मुख्यमंत्र्यांनीच जलकुंभाचे उद्घाटन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी रिपाइंचे नगरसेवक प्रकाश बनसोड, शिवसेनेचे नगरसेवक ललित झंझाड, नगरसेविका गंगा अंभोरे, संदीप अंबाडकर, किरण अंबाडकर, मुकेश उसरे आदी उपस्थित होते.दरम्यान सायंकाळी ५ वाजतादरम्यान आ. रवि राणा यांच्या नेतृत्वात जलकुंभाचे रितसर उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ‘जल है तो कलम है’ अशा घोषणा देत पाण्याचे महत्व सांगण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी आ. राणांच्या वचनपूर्तीबद्दल जल्लोष केला. हे जलकुंभ २० लक्ष रूपये खर्चून उभारण्यात आलेले असून, नाविण्यपूर्ण योजनेतून ते पूर्णत्वास आल्याची माहिती आ. राणा यांनी दिली.यावेळी आ. रवि राणा यांच्यासह नगरसेविका सुमती ढोके, बळीराम ग्रेसपुंजे, अजय मोरय्या, अयूब खान, नीळकंठ कात्रे, नितीन मोहोड, लईक पटेल, विलास वाडेकर, नील निखार, मंगेश चव्हाण, सिद्धार्थ बनसोड, जावेद मेमन, किशोर अंबाडकर, नगरसेवक मो. साबीर, सादीक अली, रऊप पटेल, वसे गुरूजी, कमरूद्दीन, अमोल मिलखे आदी उपस्थित होते. यावेळी मजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता किशोर रघुवंशी, अविनासे आदींनी हजेरी लावली होती. आ. राणांच्या हस्ते जलकुंभाचे उद्घाटन केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे गत सहा महिन्यापासून पाणी पुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन पूर्ववत होणार आहे. रमजान महिना प्रारंभ होताच जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झाल्याने बडनेरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.