शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बडनेऱ्यात नव्या जलकुंभ उद्घाटनाचे राजकीय नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:03 IST

बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.

ठळक मुद्देएकाच दिवशी दोनवेळा आनंदोत्सव : युवा स्वाभिमानचा जल्लोष; भाजपने भरविले पेढे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.जुनीवस्ती येथील जलकुंभाचे आयुर्मान संपुष्टात आल्यामुळे त्याच जागी शासन निधीतून नव्याने जलकुंभ साकारण्यात आले आहे. या जलकुंभाचे बांधकाम सुरू असताना बडनेरावासीयांना नवीवस्ती येथील जलकुंभातून पाणीपुरवठा व्हायचा. त्यामुळे गत सहा महिन्यांपासून पाण्याचे नियोजन कोलमडले. दरम्यान संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धडक दिली. दररोज पाणी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.पाणी वितरण सुलभमजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी २० मे रोजी बडनेरा येथील नवनिर्मित जलकुंभ सुरू केले जाईल, अशी ग्वाही युवा स्वाभिमानच्या आंदोलनकर्त्यांना दिली होती. त्याअनुषंगाने मजीप्राने रविवारी जलकुंभ सुरू करण्याचे नियोजन चालविले. तत्पूर्वी भाजप, सेना, रिपाइंचे कार्यकर्ते जलकुंभ परिसरात पोहचले. शिवराय कुळकर्णी यांनी जलकुंभ निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. अमृत योजनेतून जलकुंभाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन पाणी वितरणासाठी टाकी सज्ज झाल्याने भाजपने पेढे भरविले. मुख्यमंत्र्यांनीच जलकुंभाचे उद्घाटन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी रिपाइंचे नगरसेवक प्रकाश बनसोड, शिवसेनेचे नगरसेवक ललित झंझाड, नगरसेविका गंगा अंभोरे, संदीप अंबाडकर, किरण अंबाडकर, मुकेश उसरे आदी उपस्थित होते.दरम्यान सायंकाळी ५ वाजतादरम्यान आ. रवि राणा यांच्या नेतृत्वात जलकुंभाचे रितसर उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ‘जल है तो कलम है’ अशा घोषणा देत पाण्याचे महत्व सांगण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी आ. राणांच्या वचनपूर्तीबद्दल जल्लोष केला. हे जलकुंभ २० लक्ष रूपये खर्चून उभारण्यात आलेले असून, नाविण्यपूर्ण योजनेतून ते पूर्णत्वास आल्याची माहिती आ. राणा यांनी दिली.यावेळी आ. रवि राणा यांच्यासह नगरसेविका सुमती ढोके, बळीराम ग्रेसपुंजे, अजय मोरय्या, अयूब खान, नीळकंठ कात्रे, नितीन मोहोड, लईक पटेल, विलास वाडेकर, नील निखार, मंगेश चव्हाण, सिद्धार्थ बनसोड, जावेद मेमन, किशोर अंबाडकर, नगरसेवक मो. साबीर, सादीक अली, रऊप पटेल, वसे गुरूजी, कमरूद्दीन, अमोल मिलखे आदी उपस्थित होते. यावेळी मजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता किशोर रघुवंशी, अविनासे आदींनी हजेरी लावली होती. आ. राणांच्या हस्ते जलकुंभाचे उद्घाटन केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे गत सहा महिन्यापासून पाणी पुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन पूर्ववत होणार आहे. रमजान महिना प्रारंभ होताच जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झाल्याने बडनेरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.