शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

झेडपीची रखडलेली पदभरती त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अशा विविध पदांची भरती प्रक्रिया ...

अमरावती : जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अशा विविध पदांची भरती प्रक्रिया दोन वर्षांपासून रखडली आहे. सदर विविध पदांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत गट ‘क‘ मधील सरळसेवेची रिक्त पदाची जाहिरात, १ मार्च २०१९ ला प्रसिद्ध करण्यात आली होती. अनुसूचित क्षेत्राबाहेरील आणि क्षेत्रातील रिक्त पदाकरिता सदर जाहिरात प्रकाशित झाली होती. यासाठी अनेक उमेदवारांनी रीतसर अर्जही केलेत. मात्र, दोन वर्षे पूर्ण होऊनसुद्धा अद्याप या पदासाठीची परीक्षा झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रियेची तारीख निश्चित करून वेळापत्रक प्रसिद्ध करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

बॉक्स

कालबद्ध कार्यक्रमानंतर पदभरती नाही

२१ डिसेंबर २०१९ निर्गमित करुन बिगर आदिवासींनी, पात्र आदिवासींच्या बळकावलेल्या राखीव जागा रिक्त करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दिलेली होती. रिक्त होणारी अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची विशेष पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रमाची मुदत संपून गेली आहे. तरी १२,५०० रिक्त पदांपैकी फक्त काहीच पदे भरण्यात आली. उर्वरित पदांविषयी जाहिरातीही काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रिक्त झालेल्या आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा कालबद्ध कार्यक्रम आखून दिल्यावरही भरलेल्या नाहीत. ही पदे भरण्याची मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे.