शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

राज्यात टँकरवारी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:51 IST

मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे

अमरावती : मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जूनच्या तिसºया आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस झाल्यानंतर ही परिस्थिती पालटण्याचे संकेत आहेत. तथापि, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थिती आटोक्यात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गतवर्षी १२ जूनला १,७९८ गावे आणि ४,२८१ गावांना १,६६६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. यंदा टँकरची संख्या वाढली असली तरी टंचाईग्रस्त गाववाड्यांच्या संख्येमध्ये कपात झाली आहे.  कोकणातील पाच जिल्ह्यांतील २२७ गावे व ६३० वाड्यांमध्ये १०५ टँकरने, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील ३१६ गावे व ३५८ वाड्यांमध्ये २६४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील ४३० गाववाड्यांमध्ये ७५ टँकर, औरंगाबाद विभागातील ९५३ गाववाड्यांमध्ये सर्वाधिक ९६२ टँकरने, तर नागपूर विभागातील ४१ गावांमध्ये ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. अमरावती विभागातील ३३६ गावांमध्ये ३३० टँकरने पाणी पुरविले जात आहे. अर्थात राज्यातील १,७८५ गावे व १,५०६ वाड्यांमध्ये १९९ शासकीय टँकर व १,५७८ खासगी अशा १७७७ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही आकडेवारी ११ जूनपर्यंतची आहे.

१९.०२ टक्के उपयुक्त जलसाठाराज्यातील ३,२४६ जलाशयांमध्ये १२ जूनअखेर केवळ १९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. त्यात अमरावती प्रदेशातील एकूण ४४३ प्रकल्पांमध्ये १६.३४, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये ४०.३४, नागपूरमधील ३८५ प्रकल्पांमध्ये ११.३३, नाशिकमधील ५६१ प्रकल्पांमध्ये १९.६६, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये १७.२९ टक्के, तर मराठवाड्यातील ९५७ प्रकल्पांमध्ये केवळ १८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.