शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

विद्यार्थ्यांविना शाळांना प्रारंभ; शिक्षक हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी.

ठळक मुद्देपालक संघाची सभा : कोरोनाच्या सावटात सत्राला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कभातकुली : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची लगबग असते. पण, यंदा वा आतापर्यंत पहिल्यांदाच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी सोडून शिक्षक व पालकांची हजेरी लागलेली दिसत होती. कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळेचा पहिला दिवस पालक संघांच्या सभांनी पार पडला.दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात शाळा कधी सुरू होणार, याची अनिश्चितता होती. मात्र, शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार २६ जून रोजी शाळा सुरु झाल्या. परंतू शाळेत विद्यार्थी नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली. शुक्रवारी शिक्षण शाळेत दाखल झाल्याचे चित्र सर्वत्र होते. पण, विद्यार्थी नाही, असा विचित्र अनुभव पहिल्यांदाच शिक्षकांना आला. कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. त्याचा थेट प्रभाव जनजीवनावर झाला आहे. शुक्रवारी सर्वप्रथम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकाच्या उपस्थितीत सुरू झाल्या.राज्य शासनाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार, शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. शाळेत मुलांना बोलवायचे की नाही, याचा अंतिम निर्णय झाला व्यवस्थापन समितीला दिला आहे. इयत्ता नववी व दहावी आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून, तर इयत्ता सहावी ते नववीचे वर्ग ऑगस्टमध्ये आणि इयत्ता तिसरी व चौथीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. इयत्ता पहिली व दुसरीसंदर्भात मात्र अजूनही निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे, ज्यांच्या शाळा प्रवेशाची सर्वाधिक घाई असते, त्या किंडरगार्टन सुरू करण्याबाबत प्रशासन स्तरावर काहीही उल्लेख केलेला नाही.कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद; पण शिक्षण सुरु असा आॅनलाईन उपक्रम राज्यस्तरावर राबविला जात आहे. शाळेत मुले नाहीत; मात्र त्यांना डिजिटल अ‍ॅपद्वारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.- गजानन लेंडेप्राचार्य, भातकुली

टॅग्स :Schoolशाळा