शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

विद्यार्थ्यांविना शाळांना प्रारंभ; शिक्षक हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी.

ठळक मुद्देपालक संघाची सभा : कोरोनाच्या सावटात सत्राला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कभातकुली : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची लगबग असते. पण, यंदा वा आतापर्यंत पहिल्यांदाच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी सोडून शिक्षक व पालकांची हजेरी लागलेली दिसत होती. कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळेचा पहिला दिवस पालक संघांच्या सभांनी पार पडला.दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी शाळेच्या नविन शैक्षणिक सत्राला सुरुवात होते. यात यंदा कोरोनाच्या महासंकटात शाळेची घंटा वाजली. परंतु, विद्यार्थी आले नाही. शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये पालक वर्गाच्या समस्या जाणून घेऊन अशा पद्धतीने विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. इतिहासात कधी अशा पद्धतीने शाळा सुरू झाली नसावी. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात शाळा कधी सुरू होणार, याची अनिश्चितता होती. मात्र, शिक्षण विभागाने गतवर्षी केलेल्या नियोजनानुसार २६ जून रोजी शाळा सुरु झाल्या. परंतू शाळेत विद्यार्थी नव्हते. २३ मार्चपासून बंद असलेल्या शाळेत शिक्षकांची उपस्थिती मात्र दिसून आली. शुक्रवारी शिक्षण शाळेत दाखल झाल्याचे चित्र सर्वत्र होते. पण, विद्यार्थी नाही, असा विचित्र अनुभव पहिल्यांदाच शिक्षकांना आला. कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. त्याचा थेट प्रभाव जनजीवनावर झाला आहे. शुक्रवारी सर्वप्रथम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकाच्या उपस्थितीत सुरू झाल्या.राज्य शासनाच्या १५ जूनच्या परिपत्रकानुसार, शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. शाळेत मुलांना बोलवायचे की नाही, याचा अंतिम निर्णय झाला व्यवस्थापन समितीला दिला आहे. इयत्ता नववी व दहावी आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून, तर इयत्ता सहावी ते नववीचे वर्ग ऑगस्टमध्ये आणि इयत्ता तिसरी व चौथीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. इयत्ता पहिली व दुसरीसंदर्भात मात्र अजूनही निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे, ज्यांच्या शाळा प्रवेशाची सर्वाधिक घाई असते, त्या किंडरगार्टन सुरू करण्याबाबत प्रशासन स्तरावर काहीही उल्लेख केलेला नाही.कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद; पण शिक्षण सुरु असा आॅनलाईन उपक्रम राज्यस्तरावर राबविला जात आहे. शाळेत मुले नाहीत; मात्र त्यांना डिजिटल अ‍ॅपद्वारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.- गजानन लेंडेप्राचार्य, भातकुली

टॅग्स :Schoolशाळा