शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

तिवस्यात नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करा

By admin | Updated: March 5, 2017 00:09 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांच्या आत नाफेडच्यावतीने तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, ...

यशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, दोन दिवसांचा अल्टिमेटम्तिवसा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांच्या आत नाफेडच्यावतीने तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अन्यथा तीव्र जनांदोलन छेडण्याचा इशारा शनिवारी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे. शेतकरी बाजार समितीत तूर व हरभरा खरेदीकरित नाफेडच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीही केली असताना शासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी केला. नाफेडमध्ये व्यापारीच आपला फायदा करून घेत असून यामध्ये त्यांचे साटेलोटे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांची अशी बिकट अवस्था असल्याने शेतकरी त्या भावाने अमरावती येथे किंवा खासगी व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करीत आहेत. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आधीच शेतकरी सर्वच बाजूने संकटात असताना जे शेतात पीक राब-राब राबून पिकविले, त्या मालाचीसुद्धा अशी लूट होत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार, असा बनाव असणारे शासनकर्ते आता गप्प का, असा सवाल उपस्थित करून हे थापा मारून सत्तेत आलेले सरकार केवळ श्रीमंत व्यापाऱ्यांच्या हितासाठीच काम करीत असल्याचा आरोप आ. यशोमती ठाकूर यांनी केला. निवेदन देताना तिवसा बाजार समितीचे सभापती रामदास तांबेकर, जि.प. सदस्य जयंतराव देशमुख, अभिजित बोके, दापोरी ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र राऊत आदी उपस्थित होते. हे सरकार व्यापाऱ्यांच्या हिताचे धोरण राबवीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू.- यशोमती ठाकूर,आमदार, तिवसा