शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:12 IST

शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के जागांवर आॅनलाईन प्रवेश पक्रिया प्रभावीपणे राबविली जात आहे.

मुहूर्त साधला : १ मार्चपासून शाळांमध्ये प्रवेश घेता येणारअमरावती : शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील २५ टक्के जागांवर आॅनलाईन प्रवेश पक्रिया प्रभावीपणे राबविली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नोंदणीनंतर ५ फेब्रुवारीपासून २५ टक्के आॅनलाईन प्रवेशाची पक्रिया सुरू झाली आहे. यासाठी पालकांना २१ फेब्रुवारी पर्यंत आॅनलॉईन अर्ज करता येणार आहे.शालेय शिक्षण विभागाने २०१-१८ साठी प्रवेश प्रक्रिया जानेवारीपासून राबविण्यासंबंधीचा शासन निर्णय काढला आहे. निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची प्रक्रिया हाती घेतली. शनिवार ४ फेब्रुवारीला आॅनलाईन प्रक्रियेतील शाळांनी केलेल्या नोंदणीची पडताळणी शिक्षणाधिकारी यांनी केली आहे. प्रवेश प्रक्रियेतील सर्व फेऱ्या एप्रिल अखेर पूर्ण कराव्या लागणार आहे.५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, तर २७ व २८ फेब्रुवारी रोजी पहिली लॉटरी काढली जाणार आहे. यानंतर पालकांना १ ते ९ मार्चदरम्यान शाळेत जाऊन प्रवेश घेता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेनंतर शाळांनी रिक्त जागा दर्शविणे आवश्यक आहे. यासाठी १० आणि ११ मार्च अशा दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. उर्वरित जागांवर १४ आणि १५ मार्चला दुसरी लॉटरी काढून यासाठीचे प्रवेश १६ ते २१ मार्च दरम्यान घेतले जातील. अशा दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)२४ मार्चला निघणार तिसरी लॉटरी२४ आणि २५ मार्चला आवश्यकता भासल्यास तिसरी लॉटरी काढून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. यातील पालकांनी ३ ते ६ एप्रिलदरम्यान प्रवेश घेणे आवश्यक आहे. यानंतरही जागा शिल्लक राहिल्यास ७ आणि ८ एप्रिल रोजी चौथी लॉटरी काढली जाईल. रिक्त जागांवर यातही प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पाचवी लॉटरीदेखील आगामी काळात काढली जाणार आहे. प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रेआरटीई प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा,पालकांचा जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल घटकांसाठी पालकांचा उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग विद्यार्थ्यीसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र ज्या शाळा आरटीईसाठी पात्र आहेत, त्यांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्या शाळांनी नोंदणी केली नाही किंवा प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करून दिल्या नाहीत, अशा शाळांची मान्यता काढून घेणे तसेच नियमांप्रमाणे कारवाई करण्याबाबत नोटीस दिली जाणार आहे.- एस. एम. पानझाडे,प्राथमिक शिक्षणाधिकारी