शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

बारावीची मूल्यमापन प्रक्रियेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता ...

राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता कनिष्ठ महाविद्यालयांनी ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यादरम्यान १४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक ज्युनियर कॉलेजमध्ये सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत अपलोड केल्यानंतर मंडळस्तरावर अंतिम निकाल तयार केला जाणार आहे. गुण ऑनलाईन अपलोड केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय येथे सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहे. दहावीच्या गुणांची ३० टक्के, इयत्ता अकरावीच्या गुणांची ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाची ४० टक्के यावर बारावीचा अंतिम निकाल आधारलेला राहणार आहे. दहावीच्या वर्षाच्या गुणांचे वेटेज लक्षात घेता, सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत.

कोट

वरिष्ठ स्तरावरून आलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शाळास्तरावर इयत्ता बारावीच्या मूल्यमापनाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. १४ जुलैपासून ही प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे.

- जयश्री राऊत, सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ