शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

जिल्हा बँकेच्या ८८ शाखांतील ६०० कर्मचारी आजपासून संपावर

By admin | Updated: May 11, 2015 00:00 IST

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतो. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, असे व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याने ....

आता माघार नाही : जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनाअमरावती : कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतो. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, असे व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याने संघटनेद्वारा तक्रारी परत घेण्यात आल्यात. परंतु व्यवस्थापनाने हात झटकले, ही कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे. संघटनेवर कर्मचाऱ्यांचा दबाव वाढत आहे. महागाई भत्यासह इतर मागण्या मान्य होईस्तोवर आता माघार नाही, जिल्ह्यातील ८८ शाखांमधील ६०० कर्मचारी सोमवार ११ मे पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे अमरावती जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे प्रमुख कार्यवाह प्रभाकर किलोर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कर्मचाऱ्यांना केंद्रप्रमाणेच महागाईभत्ता देण्यात यावा, असा जिल्हा न्यायालय व कामगार न्यायालयाचा आदेश आहे. व्यवस्थापन मंडळाने जुलै २०११ पासून कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता रोखला आहे. बँक अडचणीत असल्याचे कारण व्यवस्थापन सांगते. प्रत्यक्षात २०११ पासून बँक नफ्यात आहे. २८ कोटी रुपयांचा आयकर बँकेने भरला आहे. ६० टक्के रिटर्नदेखील बँकेला मिळाले असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष व्ही.टी. टेकाडे यांनी केला. सन १९६२ मध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. बँकेचे ८५ टक्के कर्ज थकीत असताना कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता मिळत होता. केवळ ५ वर्षांत सदर भत्ता रोखण्यात आला आहे, हा महागाईभत्ता तत्काळ मिळावा, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वार सेवेत सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ थांबवू नये यासह अन्य मागण्यांकरिता सोमवारपासून जिल्हा बँकेचे सर्व कर्मचारी संपावर जात आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला अध्यक्ष व्ही.टी. टेकाडे, कार्याध्यक्ष अनंत सोमवंशी, प्रमुख कार्यवाह प्रभाकर किलोर, यासह सर्व तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)लिफ्ट, एसी, बँक तोट्यात कशी ?केवळ एका मजल्यावर जाण्यासाठी बँकेत लिफ्ट लावण्यात येत आहे. व्यवस्थापनाची एसी वाहने दरवर्षी खरेदी होतात. संगणकावर १५ कोटींवर खर्च झाले असताना बँक तोट्यात कशी, असा सवाल बँक कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे.रोजची ३५ कोटींची उलाढाल थांबणारजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात २ (शाखा व ६०० कर्मचारी आहेत या बँकेची रोजची उलाढाल ३५ कोटींची आहे. सोमवारच्या संपामुळे ही उलाढाल ठप्प होणार आहे. प्रामुख्याने शेतकरी, शिक्षक व जिल्हा परिषद व पंचायत समितीला याचा फटका बसणार आहे.