शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या ८८ शाखांतील ६०० कर्मचारी आजपासून संपावर

By admin | Updated: May 11, 2015 00:00 IST

कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतो. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, असे व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याने ....

आता माघार नाही : जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनाअमरावती : कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करतो. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत, असे व्यवस्थापन मंडळाने सांगितल्याने संघटनेद्वारा तक्रारी परत घेण्यात आल्यात. परंतु व्यवस्थापनाने हात झटकले, ही कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे. संघटनेवर कर्मचाऱ्यांचा दबाव वाढत आहे. महागाई भत्यासह इतर मागण्या मान्य होईस्तोवर आता माघार नाही, जिल्ह्यातील ८८ शाखांमधील ६०० कर्मचारी सोमवार ११ मे पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे अमरावती जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेचे प्रमुख कार्यवाह प्रभाकर किलोर यांनी पत्रपरिषदेत सांगितले. कर्मचाऱ्यांना केंद्रप्रमाणेच महागाईभत्ता देण्यात यावा, असा जिल्हा न्यायालय व कामगार न्यायालयाचा आदेश आहे. व्यवस्थापन मंडळाने जुलै २०११ पासून कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता रोखला आहे. बँक अडचणीत असल्याचे कारण व्यवस्थापन सांगते. प्रत्यक्षात २०११ पासून बँक नफ्यात आहे. २८ कोटी रुपयांचा आयकर बँकेने भरला आहे. ६० टक्के रिटर्नदेखील बँकेला मिळाले असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष व्ही.टी. टेकाडे यांनी केला. सन १९६२ मध्ये अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. बँकेचे ८५ टक्के कर्ज थकीत असताना कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता मिळत होता. केवळ ५ वर्षांत सदर भत्ता रोखण्यात आला आहे, हा महागाईभत्ता तत्काळ मिळावा, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वार सेवेत सामावून घ्यावे, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ थांबवू नये यासह अन्य मागण्यांकरिता सोमवारपासून जिल्हा बँकेचे सर्व कर्मचारी संपावर जात आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला अध्यक्ष व्ही.टी. टेकाडे, कार्याध्यक्ष अनंत सोमवंशी, प्रमुख कार्यवाह प्रभाकर किलोर, यासह सर्व तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)लिफ्ट, एसी, बँक तोट्यात कशी ?केवळ एका मजल्यावर जाण्यासाठी बँकेत लिफ्ट लावण्यात येत आहे. व्यवस्थापनाची एसी वाहने दरवर्षी खरेदी होतात. संगणकावर १५ कोटींवर खर्च झाले असताना बँक तोट्यात कशी, असा सवाल बँक कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे.रोजची ३५ कोटींची उलाढाल थांबणारजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात २ (शाखा व ६०० कर्मचारी आहेत या बँकेची रोजची उलाढाल ३५ कोटींची आहे. सोमवारच्या संपामुळे ही उलाढाल ठप्प होणार आहे. प्रामुख्याने शेतकरी, शिक्षक व जिल्हा परिषद व पंचायत समितीला याचा फटका बसणार आहे.