शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

रखडलेले सिंचन प्रकल्प

By admin | Updated: November 29, 2014 00:22 IST

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील चांदसुरा ६.७८, टिमटाला ९.२४, चांदनदी ११७.५६ कोटी रूपयांच्या या लघु प्रकल्पांना ...

अमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील चांदसुरा ६.७८, टिमटाला ९.२४, चांदनदी ११७.५६ कोटी रूपयांच्या या लघु प्रकल्पांना राज्यशासनाने सन २००७ आणि २००८ मध्ये मंजूर केले. यापैकी भूसंपादनाअभावी, वनजमिनी व सुप्रमा अशा विविध कारणांमुळे रखडून पडले आहेत. चिखलदरा तालुक्यातील डोमा या लघुप्रकल्पाला सन २००९ मध्ये मंजुरी देऊन या प्रकल्पाच्या कामासाठी त्यावेळी ६.३३कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. आमपाटी हा लघु प्रकल्प सन २००९ मध्ये मंजूर असून यासाठी १८.१३ कोटी रूपये मंजूर केले आहेत. धारणी तालुक्यातील पाटीया या लघु प्रकल्पाला सन २००९ मंजुरी दिली आहे. याची किंमत ९.५६ रूपये एवढी होती. राणापीसा प्रकल्पाला सन २००८मध्ये मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पाची किंमत ७.०३ कोटी रूपये होती.एकंदरीत जिल्ह्यातील २७ हजार २१८ हेक्टर क्षमतेचा निम्नपेढी मोठा पकल्प, तिनमध्यम आणि १४ लघु प्रकल्प केवळ सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने यातील बहूतांश प्रकल्पाची कामे रखडले आहेत. याशिवाय वनकायद्याची आडकाठी, पुनर्वसनाची अडचण, मातीचा अभाव अशा अडचणी काही प्रकल्पांच्या कामात येत असल्याचे प्रमुख कारणे आहेत. सन २००४मध्ये निम्नपेढी प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. मागील दहा वर्षांचा कालावधी लोटून गेल्यानंतरही अपूर्ण सिंचन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सायीसुविधा मिळाल्या नाहीत.परिणामी जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे .वरूड तालुका राज्य शासनाने सन २००६ ते २००९ मध्ये वरूड तालुक्यात निम्नचारगढ, नागठाणा, भिमंडी, झटामझिरी, पवणी, बहादा या सहा लघु पकल्पांना सलग तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ३ हजार ९४२ हेक्टर क्षमतेच्या लघु प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांच्या कामाअभावी या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाअभावी कापूस, सोयाबीन, तूर या पिकांवरच समाधान मानावे लागत आहे. केवळ सिंचनाची सुविधा नसल्यामुळे संत्राबागायती परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या वरूड तालुक्यातील प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना फळबागा, मिरची, कांदा, गहू ,हरभरा यासारखे पीक उत्पादनाला मुकावे लागत आहे.धारणी तालुका धारणी तालुक्यातील पाटीया आणि राणापीसा या दोन लघु प्रकल्पांना सन २००८ व २००९मध्ये प्रशासकीय मंजुरात मिळाली. मात्र तेव्हापासून आजघडीपर्यंत वनजीवी मंडळाची मान्यता भूसंपादन व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी या भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही. परिणामी आदिवासी शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर आदी पीकावरच समाधान मानावे लागते मात्र सिंचनाची सोय झाल्यास या भागात भाजीपाला व अन्य बागायती पिके आदिवासी शेतकरी घेऊ शकतात.तिवसा तालुका तिवसा तालुक्यातील शिवणगाव या लघु प्रकल्पाला सन २००९ मध्ये मंजुरी दिली. या प्रकल्पातून ४२४ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. हा प्रकल्प भूसंपादन आणि सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. केवळ सिंचनाची सोय नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांवरच समाधान मानावे लागत आहे. मात्र सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास येथील शेतकऱ्यांना गहू हरभरा व अन्य बागायती पिके घेता येऊ शकतात.चांदूरबाजार तालुकाचांदूरबाजार तालुक्यातील बोर्डी नाला या मध्यम सिंचन प्रकल्पाला शासनाने सन २००६मध्ये प्रशासकीय मान्यता दिली. या मध्यम प्रकल्पामुळे ४ हजार १२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.मात्र या प्रकल्पाचे काम भुसंपादना अभावी काम रखडल्याने या परिसरात कापलस सोयाबिन तूर आदी पिकावरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते. मात्र सिंचनाची सोय झाल्यास येथे संत्रा, केळी आदी पिके सिंचनाखाली येऊ शकते.नांदगाव खंडेश्र्वर तालुका नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील चांदसुरा, टिमटाला,चांदनदी आदी लघु प्रकल्पांना सन २००६ते २००८साली शासनाने मंजुरी दिली. या लघु प्रकलपामुळे सुमारे २२५४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र भूसंपादन, वनजमीन, आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी ही लघु प्रकल्प बंद पडली आहेत. परिणामी येथील शेतकऱ्यांना कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांवर समाधान मानून शेती करावी लागत आहे. या भागात सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास संत्रा, डाळिंब, व अन्य बागायती पिके घेण्यास मोठी मदत होऊ शकते.चिखलदरा तालुका मेळघाटातील चिखलदरा या तालुक्यात सन डोमा आणि आमपाटी या दोन लघु प्रकल्पांना शासनाने २००९ साली मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे १५८३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. मात्र या प्रकल्पांना भूसंपादनाची मोठी अडचण असल्यामुळे प्रकल्पाचे कामे थंडबस्त्यात आहेत. परिणामी या भागातील आदिवासी शेतकरी सोयाबीन, तूर आदी पिकांवरच समाधान मानावे लागते. मात्र सिंचनाची सोय झाल्यास या भागात भाजीपाला व फळपिके आदिवासी शेतकरी घेऊ शकतात .