लांब पल्ल्यासाठी एसटीऐवजी ट्रॅव्हलची निवड
अमरावती : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असा सर्वसाधारण समज आहे. असे असताना प्रवाशांकडून ट्रॅव्हल्स बसलाच अधिक पसंती दिली जात आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतांश नागरिकांकडून एसटी बसऐवजी ट्रॅव्हल्सची निवड करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोना संकटामुळे एसटी महामंडळाला खूप मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे एसटीचे उत्पन्न जवळपास ठप्प झाले होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने गत जून महिन्यापासून जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक एसटी बसच्या तुलनेत ट्रॅव्हल्सला जास्त पसंती देत आहेत.
बॉक्स
खासगी वाहनांच्या अपघातात वाढ
अलीकडच्या काळात खासगी वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे. बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे होत असले तरी याला वाहनधारक तेवढेच जबाबदार आहेत. कारण रस्ता चांगला असल्यास वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. यामुळे वाहनावर नियंत्रण मिळविणे कठीण होत असल्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत आहेत.
कोट
एसटी बसमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लांब करण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसमध्ये या सुविधा प्रामुख्याने देण्यात येतात. एसटी बसमध्ये आरक्षणाची व्यवस्थादेखील आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेऊन एसटी बसने प्रवास करावा.
- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक
बॉक्स
एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल्स सुसाट
मोटार वाहन कायद्यानुसार एसटी गाड्यांना स्पीड लॉक करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर ८० किलोमीटर प्रतितास, राज्य महामार्गावर ७० किलोमीटर प्रतितास स्पीड लॉक करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्सला मात्र तशी कोणतीही प्रकारची लाॅक नाही. त्यामुळे त्या गाड्या सुसाट असतात. एसटीच्या तुलनेत ट्रॅव्हल्स कमी वेळेत पोहोचतात.
बॉक्स
जिल्ह्यात झालेले अपघात
२०१८-७४
२०१९-५१
२०२०-२०
२०२१-०६ २६ जुलैपर्यंत
कोट
कोट
दिवसभर काम करून रात्रीतून प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी एसटीच्या फेऱ्या कमी असतात. ट्रॅव्हल्स सहज उपलब्ध होतात. एसटीच्या तुलनेत तिकिटाचा दर कमी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास प्राधान्य देतो.
- सतीश कावरे, प्रवासी
कोट
बरेचदा महत्त्वाचे कामासाठी जायचे असल्यास वेळेवर एसटी बस मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी वाहनाने लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे, एसटी बसपेक्षा खासगी ट्रॅव्हल्स अगोदर पोहोचतात. त्यामुळे आम्ही दूरचा प्रवास खाजगी ट्रॅव्हल्सने करतो.
- अभिजित पवार, प्रवासी