शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

एसटी बसची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:49 IST

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : चालक, वाहकांचा बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/परतवाडा : सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही. परिणामी हजारो प्रवाशांंचे हाल झाले, तर खासगी ट्रॅव्हल्स चालकांची बल्ले बल्ले झाली.राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसची चाके थांबल्याचा फटका शहरासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, परतवाडा येथे संपाचे चित्रीकरण करणाºया अज्ञात छायाचित्रकाराने कुणासाठी चित्रीकरण करीत असल्याची माहिती न दिल्याने संतप्त कर्मचाºयांनी त्याला चोप देत पिटाळून लावल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. अमरावती आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस स्थानकासमोरूनच प्रवासी वाहतुकीला खासगी वाहतूकदारांना वाव मिळाला. त्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट केली. बाहेरगावाहून आलेल्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवाळीनिमित्त घरी परतणाºयांना एसटी बंदचा फटका बसला. जिल्ह्यात एकूण आठ आगार असून, सुमारे ४०० बस आहेत. ग्रामीण भागात सर्वात मोठे परतवाडा आगार असून, येथून परिवहन महामंडळाच्या ७८ बसगाड्यांद्वारे ३५० फेºया करण्यात येतात. दररोज किमान सहा लाख रुपये उत्पन्न मिळते. आगारात चालक, वाहक व मेकॅनिक असे जवळपास ४०० कर्मचाºयांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.अमरावती आगारातून दरदिवसाला ११०० बसेस धावतात. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. मंगळवारी एका दिवसाचे २५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती अमरावती बस स्थानक प्रबंधक उमेश इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.काळी-पिवळी जोरातमंगळवारी एसटी बसची चाके थांबल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी घेतला आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी शहरात येणाºयांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी काळी-पिवळी चालकांनी ‘कॅश’ केली.मागण्यांसाठी संपकरी चालक, वाहक, कर्मचारी आक्रमक दिसून आले. ३ अधिकारी वगळता परतवाडा आगारातील कर्मचारी संपावर गेल्याची माहिती आगारप्रमुख अनिकेत बल्लाळ यांनी दिली.ग्रामीणसह शहरीभागात कोंडीपरतवाडा आगारातून प्रत्येकी १५ मिनिटाने अमरावतीसाठी बस असून, अकोला, नागपूर, होशंगाबाद, खंडवा, भैसदही व जिल्हाभरातील तालुक्यांत बसफेºया जातात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फेºया असल्याने सोमवारी संपामुळे प्रवाशांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला. मात्र, खासगी वाहनांची संख्या अल्प असल्याने हजारो प्रवाशांंना त्याचा फटका बसला.