शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एसटी बसची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:49 IST

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : चालक, वाहकांचा बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/परतवाडा : सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही. परिणामी हजारो प्रवाशांंचे हाल झाले, तर खासगी ट्रॅव्हल्स चालकांची बल्ले बल्ले झाली.राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसची चाके थांबल्याचा फटका शहरासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, परतवाडा येथे संपाचे चित्रीकरण करणाºया अज्ञात छायाचित्रकाराने कुणासाठी चित्रीकरण करीत असल्याची माहिती न दिल्याने संतप्त कर्मचाºयांनी त्याला चोप देत पिटाळून लावल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. अमरावती आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस स्थानकासमोरूनच प्रवासी वाहतुकीला खासगी वाहतूकदारांना वाव मिळाला. त्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट केली. बाहेरगावाहून आलेल्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवाळीनिमित्त घरी परतणाºयांना एसटी बंदचा फटका बसला. जिल्ह्यात एकूण आठ आगार असून, सुमारे ४०० बस आहेत. ग्रामीण भागात सर्वात मोठे परतवाडा आगार असून, येथून परिवहन महामंडळाच्या ७८ बसगाड्यांद्वारे ३५० फेºया करण्यात येतात. दररोज किमान सहा लाख रुपये उत्पन्न मिळते. आगारात चालक, वाहक व मेकॅनिक असे जवळपास ४०० कर्मचाºयांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.अमरावती आगारातून दरदिवसाला ११०० बसेस धावतात. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. मंगळवारी एका दिवसाचे २५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती अमरावती बस स्थानक प्रबंधक उमेश इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.काळी-पिवळी जोरातमंगळवारी एसटी बसची चाके थांबल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी घेतला आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी शहरात येणाºयांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी काळी-पिवळी चालकांनी ‘कॅश’ केली.मागण्यांसाठी संपकरी चालक, वाहक, कर्मचारी आक्रमक दिसून आले. ३ अधिकारी वगळता परतवाडा आगारातील कर्मचारी संपावर गेल्याची माहिती आगारप्रमुख अनिकेत बल्लाळ यांनी दिली.ग्रामीणसह शहरीभागात कोंडीपरतवाडा आगारातून प्रत्येकी १५ मिनिटाने अमरावतीसाठी बस असून, अकोला, नागपूर, होशंगाबाद, खंडवा, भैसदही व जिल्हाभरातील तालुक्यांत बसफेºया जातात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फेºया असल्याने सोमवारी संपामुळे प्रवाशांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला. मात्र, खासगी वाहनांची संख्या अल्प असल्याने हजारो प्रवाशांंना त्याचा फटका बसला.